शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

साहेब! शरीराशिवाय विकण्यासाठी काहीच उरले नाही

By admin | Updated: December 12, 2015 06:17 IST

अकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा

धरणे मंडपातील सावकारपीडित शेतकऱ्यांची विदारक व्यथानिशांत वानखेडे ल्ल नागपूरअकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा कळसच म्हणावे लागेल. पण साहेब ! शेतकऱ्याईजवळ शरीरातील अवयवाशिवाय विकण्यासारखे आता काहीच उरले नाही, मग करावं काय, असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न धरणे मंडपात बसलेल्या अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्याने विचारला आहे. दुष्काळ, नापिकी अशा परिस्थितीत होरपळल्यानंतरही सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र अशा जीवघेण्या परिस्थितीतही प्रशासनाकडून त्यांची कशी पिळवणूक केली जाते याचे कथन सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रच्या धरणे मंडपात बसलेल्या शेतकऱ्यांनी केले. आंदोलनात बसलेले अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द येथील रामेश्वर वाकोडे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाची हकीकत सांगितली. रामेश्वर यांच्यासह गावातील ६५ शेतकऱ्यांच्या जमिनी एका स्थानिक सावकाराकडे गहाण होत्या. मात्र नियमानुसार अवैध ठरत असलेल्या या सावकाराविरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि जिंकलीही. न्यायालयाने संबंधित सावकारावर कारवाईचे करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकाला दिले. मात्र निबंधकाने कोणतीही कारवाई केली नाही. या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे वाकोडे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या धारवा येथील महादेव घुले या शेतकऱ्यासोबतही हाच प्रकार झाला. जिल्हा निबंधकाने १० जुलै २०१५ला येथील अवैध सावकारावर कारवाई करण्याचे निर्देश सहायक निबंधकाला दिले. मात्र ७ महिने उलटूनही संबंधित अधिकाऱ्याने कुठलीही कारवाई केली नाही. अवैध सावकारावर गुन्हे सिद्ध होऊनही कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रतर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सावकारी कर्जमुक्ती लाभाची कालमर्यादा १५ वर्षावरून ३० वर्षे करण्यात यावी, अवैध सावकारांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी या व इतर मागण्या या संघटनेने केल्या आहेत.(प्रतिनिधी)निबंधकाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचितआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अरुण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील सावकारी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अकोल्याच्या जिल्हा निबंधकाने सावकाराला लाभ पोहचविण्यासाठी त्या सावकाराने संपूर्ण जिल्ह्यात वाटलेल्या कर्जाची यादी जाहीर केली. मात्र नियमानुसार परवानाधारक सावकाराचे कार्यक्षेत्र केवळ तालुक्यापुरते मर्यादित आहे. यामुळे निबंधकाच्या यादीमुळे हा सावकार अवैध ठरला होता. यामुळे सावकाराला वाचविण्यासाठी निबंधकाने तालुक्याच्या कार्यक्षेत्राला नगर असे दर्शविले.