शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

साहेब! शरीराशिवाय विकण्यासाठी काहीच उरले नाही

By admin | Updated: December 12, 2015 06:17 IST

अकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा

धरणे मंडपातील सावकारपीडित शेतकऱ्यांची विदारक व्यथानिशांत वानखेडे ल्ल नागपूरअकोला जिल्ह्यातील सावकारांकडून शेतकऱ्यांची किडनी काढण्याचे प्रकरण म्हणजे शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचा कळसच म्हणावे लागेल. पण साहेब ! शेतकऱ्याईजवळ शरीरातील अवयवाशिवाय विकण्यासारखे आता काहीच उरले नाही, मग करावं काय, असा काळीज पिळवटून टाकणारा प्रश्न धरणे मंडपात बसलेल्या अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्याने विचारला आहे. दुष्काळ, नापिकी अशा परिस्थितीत होरपळल्यानंतरही सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना कशा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र अशा जीवघेण्या परिस्थितीतही प्रशासनाकडून त्यांची कशी पिळवणूक केली जाते याचे कथन सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रच्या धरणे मंडपात बसलेल्या शेतकऱ्यांनी केले. आंदोलनात बसलेले अकोला जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द येथील रामेश्वर वाकोडे यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाची हकीकत सांगितली. रामेश्वर यांच्यासह गावातील ६५ शेतकऱ्यांच्या जमिनी एका स्थानिक सावकाराकडे गहाण होत्या. मात्र नियमानुसार अवैध ठरत असलेल्या या सावकाराविरोधात शेतकऱ्यांनी न्यायालयीन लढाई लढली आणि जिंकलीही. न्यायालयाने संबंधित सावकारावर कारवाईचे करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकाला दिले. मात्र निबंधकाने कोणतीही कारवाई केली नाही. या अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे वाकोडे यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या धारवा येथील महादेव घुले या शेतकऱ्यासोबतही हाच प्रकार झाला. जिल्हा निबंधकाने १० जुलै २०१५ला येथील अवैध सावकारावर कारवाई करण्याचे निर्देश सहायक निबंधकाला दिले. मात्र ७ महिने उलटूनही संबंधित अधिकाऱ्याने कुठलीही कारवाई केली नाही. अवैध सावकारावर गुन्हे सिद्ध होऊनही कारवाई का केली जात नाही, असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रश्नांसह विविध मागण्यांसाठी सावकारग्रस्त शेतकरी समिती महाराष्ट्रतर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सावकारी कर्जमुक्ती लाभाची कालमर्यादा १५ वर्षावरून ३० वर्षे करण्यात यावी, अवैध सावकारांवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी या व इतर मागण्या या संघटनेने केल्या आहेत.(प्रतिनिधी)निबंधकाच्या चुकीमुळे शेतकरी लाभापासून वंचितआंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अरुण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य शासनाने शेतकऱ्यांवरील सावकारी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर अकोल्याच्या जिल्हा निबंधकाने सावकाराला लाभ पोहचविण्यासाठी त्या सावकाराने संपूर्ण जिल्ह्यात वाटलेल्या कर्जाची यादी जाहीर केली. मात्र नियमानुसार परवानाधारक सावकाराचे कार्यक्षेत्र केवळ तालुक्यापुरते मर्यादित आहे. यामुळे निबंधकाच्या यादीमुळे हा सावकार अवैध ठरला होता. यामुळे सावकाराला वाचविण्यासाठी निबंधकाने तालुक्याच्या कार्यक्षेत्राला नगर असे दर्शविले.