शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एकस्वरात गायिले ‘वंदे मातरम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:03 IST

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भगतसिंह यांचे पुतणे किरणजीत सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या वंदे मातरमच्या गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारावलेले होते.

ठळक मुद्देशहीद भगतसिंह यांचे पुतणे करणजीत सिंह यांची उपस्थिती :राष्ट्रभक्तीने भारावले वातावरण

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वदिनी देशप्रेमाचा संदेश देण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने ‘अखंड भारत संकल्प दिन’अंतर्गत आयोजित सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमात हजारो शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका स्वरात वंदे मातरमचे गायन केले. शहीद-ए-आझम भगतसिंह यांचे पुतणे किरणजीत सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या वंदे मातरमच्या गायनाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारावलेले होते.प्रतिष्ठानच्यावतीने स्थानिक सक्करदरा चौक येथे दरवर्षी सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम होत असून हे सहावे वर्ष होते. नियोजित कार्यक्रमानुसार सकाळपासून विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी हातात तिरंगा ध्वज आणि देशप्रेमाचे संदेश देणारे फलक घेऊन चौकात गोळा झाले होते. मंचावर किरणजित सिंह यांच्यासह आ. नागो गाणार, डॉ. विलास डांगरे, डॉ. उदय बोधनकर, मेजर हेमंत जकाते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक डॉ. रवींद्र भोयर, माजी आमदार मोहन मते, कार्याध्यक्ष ईश्वर धिरडे, संयोजक दीपक धुरडे माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. इटली येथील आध्यात्मिक गुरू गुरुमाही त्यांच्या इटलीतील शिष्यांसह उपस्थित होते. डॉ. रवींद्र भोयर यांनी प्रास्ताविकातून या आयोजनाची भूमिका मांडली. याप्रसंगी ब्रिगेडियर माधव खानझोडे, मेजर जनरल अजित गद्रे, सार्जंट दिनकर कडू, हवलदार विलास दवणे, हवलदार नरेश बर्वे, १९७१ च्या पाकिस्तान युद्धात शहीद झालेले हरिवंश सिंह यांच्या पत्नी प्रीतम कौर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सैनिकांच्या कु टुंबीय महिला जयश्री पाठक, अरुणा फाले, छाया कडू, लता धांडे, सुनीता कुंभारे, विद्या लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला.यावेळी बोलताना किरणजित सिंह यांनी स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या कुटुंबातील योगदान आणि शहीद भगतसिंह यांच्या आठवणींना विद्यार्थ्यांसमोर उजाळा दिला. भगतसिंह केवळ एक क्रांतिकारी नव्हते तर वैचारिक पातळीवर त्यांनी उच्च स्तर गाठला होता. देशात आजही भ्रष्टाचार, बेराजगारी आणि जातीय भेदभावाची समस्या कायम आहे. त्यामुळे भगतसिंह व त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी ज्या विचाराने लढा दिला, ते स्वप्न अपूर्ण असल्याची खंत किरणजित सिंह यांनी व्यक्त केली. संचालन अभिजित मुळे यांनी केले. त्यानंतर सहभागी हजारो विद्यार्थी, परिसरातील नागरिकांनी उभे राहून एकसुरात वंदे मातरम्चे गायन केले.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमIndependence Dayस्वातंत्र्य दिवस