शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

श्याम धर्माधिकारी : नागपूरला प्राधान्य देणारा रंग-चित्रभूमीवरील हरहुन्नरी दिग्दर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:10 IST

रंगभूमी आणि चित्रपटनगरी यात पुणे-मुंबई आणि मराठवाड्याचा वर्चस्व राहीला आहे. अशात नागपूर आणि विदर्भाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी झटणारा रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून श्याम धर्माधिकारी यांचे नाव नागपुरच्या इतिहासात कोरला जाणार आहे. रविवारी हृदयाघाताने त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देव्यक्तिमत्त्व विकास साधण्याचा ‘नाट्यपरिजात’चा वारसा कोण पुढे नेणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगभूमी आणि चित्रपटनगरी यात पुणे-मुंबई आणि मराठवाड्याचा वर्चस्व राहीला आहे. अशात नागपूर आणि विदर्भाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी झटणारा रंगकर्मी आणि चित्रपट दिग्दर्शक म्हणून श्याम धर्माधिकारी यांचे नाव नागपुरच्या इतिहासात कोरला जाणार आहे. रविवारी हृदयाघाताने त्यांचे निधन झाले. अचानक आलेल्या निधन वार्तेने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात नवे काही करू बघण्याचा प्रचंड आघात बसला आहे, तो धर्माधिकारी यांच्या कर्तृत्त्वामुळेच.

उद्योग आणि कलाक्षेत्राचा विकास जसा मुंबई-पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात झाला. त्या तुलनेत विपुल बुद्धीमत्ता असतानाही विदर्भात झालेला नाही. राज्य सरकारचा विदर्भाकडे बघण्याचा तुसडेपणाचा भावच त्याला कारणीभूत ठरला. मात्र, माझे घर-माझे गाव-माझे क्षेत्र तर जबाबदारीही माझीच... या सुत्राने श्याम धर्माधिकारी यांनी आपले कर्तृत्त्व गाजवले. त्यातूनच त्यांनी हौशी रंगभूमी म्हणून परिचयाची असणाऱ्या वैदर्भीय रंगभूमीला व्यावसायिकतेची जोड देण्याचे भरपूर प्रयत्न केले. त्यातून, हाऊसफुल्ल ठरलेले ‘सापळा’ हे नाटक २००१ साली व्यावसायिक रंगभूमीवर वैदर्भीय नटांच्याच संगतीने आणले. विशेष म्हणजे, ज्या काळात हे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर आले, तो काळ नागपूर आणि वैदर्भीय रंगभूमीच्या अधोगतीचा असल्याचे मानले जाते. अशा काळात निपचित पडत चाललेल्या रंगभूमीला उभारी देण्याचे काम झाले. यापूर्वी तर नागपुरात नाट्यचवळ मार खायला लागली होती. अशात नव्या कल्पनांना साकार करत त्यांनी १९८५मध्ये ‘नाट्यपरिजात’ ही नाट्यसंस्था स्थापन केली आणि यातून लहान मुलांचे नाट्य, संगीत आणि अभिनयाद्वारे व्य्क्तिमत्त्व विकास साधण्यात मोलाची भूमिका निभावली. नाट्यक्षेत्रात दिग्दर्शन, लेखन आणि अभिनयात समोर असणाऱ्या धर्माधिकारी यांनी या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून अनेक नवोदितांना पुढे आणले. संस्थेच्या माध्यमातून राज्यनाट्य, कामगार स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन नवोदितांना व्यासपीठ दिले. सोबतच नाट्यकार्याशाळा घेऊन अनेक कलावंत घडविले. 
मुळात मेकॅनिकल अभियंते असलेल्या धर्माधिकारी यांना रंगभूमी आणि चित्रपटांचे प्रचंड वेड. त्यातूनच, त्यांनी स्वत:ची नोकरी व व्यवसाय सांभाळत या क्षेत्रात भरारीने काम केले. चित्रपटासाठी लागणाºया संपूर्ण यंत्रणेला नागपुरात आणून, नागपुरातच चित्रपट निर्मिती करण्याचे पहिले श्रेय त्यांनाच जाते. त्यासाठी सिनेमॅटोग्राफी, फिल्म अ‍ॅण्ड टी.व्ही. टेक्नॉलाजी, चित्रपटाचे संपादन आणि दिग्दर्शनाचे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले. शिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले असल्याने अनेक महाविद्यालयात त्यांनी अध्यापनाचेही कार्य केले. अतिथी व्याख्यानासाठीही त्यांना वेगवेगळ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात निमंत्रित करण्यात येत होते. राज्य शासनासाठी आणि स्वतंत्रपणेही त्यांनी १४० पेक्षा जास्त लघुपटाची निर्मिती केली. त्यात गरीबी, शेतकरी समस्या, सामाजिक आशयावरील विषय हाताळले. सोबतच ‘नाम फाऊंडेशन’साठीचा लघुपटही त्यांनी तयार केला आहे. यासोबतच, त्यांनी १३ मराठी आणि तीन हिंदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नुकताच ‘मैं कोन हुँ’ हा चित्रपट पूर्ण केला. त्यातही संपूर्ण यंत्रणा नागपूरचीच होती. नागपूरकरांना चित्रपटाचे प्रत्यक्ष धडे देण्यासाठी त्यांनी ‘माहेरची साडी’ या गाजलेल्या चित्रपटाचे चित्रिकरण करण्यासाठी त्या चमूला नागुरात आणले होते. सिनेमा म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो हे नागपूरच्या कलावंतांना सांगण्याचे श्रेय श्याम धर्माधिकारी यांना जाते. नागपूरकर कलावंतांना चित्रपटात स्थान मिळावे म्हणून ते सातत्याने धडपडत होते. केवळ हौस म्हणून नाटक करण्यापेक्षा व्यावसायिक नाटक उभारून कलावंतांना लाभ व्हावा, ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या धडपडीचा तो वारसा आता कोण स्विकारणा, असा हृदयी प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे.त्यांच्या कामात सातत्य होते. रंगभूमीकडे व्यावसायिक दृष्टीकोण बघणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये ते गणले जात. त्याच दृष्टीकोणातून ‘सापळा’ या नाटकाने प्रसिद्धी मिळविली होती.नरेश गडेकर, उपाध्यक्ष - अ.भा. मराठी नाट्यपरिषदमाझ्यातील अभिनेत्याची जाणिव त्यांनाच झाली आणि ते माझे गुरू ठरले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘नाट्यपरिजात’चा १९८८ पासून सदस्य आहे. ‘सापळा’मध्ये मी काम केले. त्यांच्यामुळेच माझे भाग्य बदलले.राजेश चिटणीस, प्रसिद्ध अभिनेता

टॅग्स :NatakनाटकTheatreनाटकnagpurनागपूर