शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चामुंडी स्फोटातील जखमी मरस्कोल्हे पाठोपाठ श्रद्धा पाटीलचाही मृत्यू; तिसऱ्या दिवशीही धामना गाव शोकातच

By नरेश डोंगरे | Updated: June 15, 2024 21:19 IST

मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

नरेश डोंगरे धामना, नागपूर : तब्बल ४८ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर श्रद्धा वनराज पाटील (वय २२) या तरुणीने काळापुढे हात टेकले. डॉक्टरांनी तिला शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मृत घोषित केले. तिच्या मृत्यूमुळे धामना गावात गुरूवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा. लि. कंपनीत गुरूवारी, १३ जूनला दुपारी भीषण स्फोट झाल्यामुळे प्रांजली किसनाजी मोंदरे (वय २२), वैशाली आनंदराव क्षीरसागर (२०), प्राची श्रीकांत फलके (१९), मोनाली शंकरराव अलोने (२५) आणि शीतल आशिष चटप (३०) या पाच तसेच पन्नालाल बंदेवार (६०, रा. सातनवरी) अशा सहा जणांचा करूण अंत झाला. तर दानसा मरस्कोल्हे (२६, रा. मध्य प्रदेश), श्रद्धा वनराज पाटील (२२, रा. धामना) आणि प्रमोद चवारे (२५, रा. नेरी) या तिघांवर रवीनगर चाैकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही शरीरात अत्यंत गंभीर जखमा असल्याने दानसा मरस्कोल्हे याने शुक्रवारी रात्री तर श्रद्धा वनकर हिने शनिवारी दुपारी प्राण सोडला.तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम अन्...

विशेष म्हणजे, प्रांजली, वैशाली, प्राची, मोनाली आणि शीतल या पाच जणींवर शुक्रवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अत्यंत शोकाकुल अवस्थेत अंत्यसंस्कार केले. त्यांच्या तिसऱ्या दिवसाची पूजा आणि कार्यक्रम आज धामना गावात सुरू होता. तेवढ्यात श्रद्धा वनकरच्या मृत्यूचे वृत्त गावात धडकले अन् गावावरची शोककळा अधिकच गडद झाली. भावविवश गावकऱ्यांनी श्रद्धावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त धामना गावात आणि कंपनी परिसरात लावण्यात आला आहे.प्रमोदची प्रकृती चिंताजनक

या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद चवारे (वय २५, रा. नेरी) या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले जात असल्याचे डॉ. पिनाक दंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, दानसा मरस्कोल्हे या तरुणाचा मृतदेह शुक्रवारी रात्रीच त्याच्या मध्य प्रदेशातील गावाकडे रवाना करण्यात आला. यावेळी त्याचे आई-वडील आणि नात्यातील एक तरुण सोबत होता, असेही डॉ. दंदे यांनी सांगितले.