शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

धक्कादायक! नागपुरात परराज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ७३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 10:44 IST

Nagpur News corona मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे.

ठळक मुद्दे६७३ रुग्ण, ४९१ मृत्यू पाच दिवसात २९ रुग्ण, २९ मृत्यू

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे. विशेषत: कोविडच्या या काळात आतापर्यंत जिल्हाबाहेरील ६७३ रुग्णांनी उपचार घेतला. मात्र, यातील ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा हा दर ७३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, मागील पाच दिवसांत जिल्हाबाहेरील २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच संख्येत मृत्यूही झाले आहेत.

दिवाळीपूर्वी कमी झालेली करोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासकीयसह खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दिवाळीपूर्वी बाधितांची संख्या हजाराखाली गेली होती, ती आता १३७४ वर पोहचली आहे. सध्या मेडिकलमध्ये २००, मेयोमध्ये ८०, एम्समध्ये ३१ तर उर्वरीत रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. नागपुरात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगाणा आदी राज्यातून येणाऱ्या बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. हे रुग्ण उशिरा रुग्णालयात पोहचत असल्याने यात गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगीमध्ये उपचार घेणाऱ्या जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या मोठी आहे.

-एकाच दिवशी ११ रुग्ण, ११ मृत्यू

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात २० तारखेला ११ रुग्ण ११ मृत्यू, २१ तारखेला ५ रुग्ण ५ मृत्यू, २२ तारखेला १ रुग्ण १ मृत्यू, २३ तारखेला ७ रुग्ण ७ मृत्यू, २४ तारखेला ४ रुग्ण ४ मृत्यू तर २५ तारखेला १ रुग्ण व १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

-मेडिकलमध्ये ७ दिवसांत ११ मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील ७ दिवसात जिल्हाबाहेरील ४३ रुग्ण आले असताना १२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील ३, यवतमाळ जिल्ह्यातील २, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर मध्य प्रदेशातील २ रुग्णांचा समावेश आहे.

-उशिरा उपचार व गंभीर रुग्णांची संख्या अधिक

जिल्हाबाहेरुन येणारे बहुसंख्य रुग्ण उशिरा रुग्णालयात येतात. परिणामी, या रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याने यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. विशेषत: कोविड रुग्णांना नागपुरात आणताना ऑक्सिजनसह इतर बाबींची योग्य ती काळजी घेतली जात नसावी, हेही एक कारण असू शकते. लक्षणे दिसताच रुग्ण उपचाराखाली आल्यास जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस