शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

धक्कादायक! ६०० घोटाळेबाज कर्मचाऱ्यांवर झाली नाही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 21:09 IST

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देहायकोर्टात आकडेवारी सादर : चार वर्षावर विलंबाचा मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध, तो सेवानिवृत्त झाल्यावर, चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी घडलेल्या घोटाळ्यामध्ये शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येणार नाही अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमात करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध तो सेवेत असतानाच शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई सुरू करणे आवश्यक आहे. त्यात विलंब होऊन नियम २७ मधील तरतूद लागू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येत नाही. मुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत विविध विभागांमधील घोटाळ्याच्या ३२६ प्रकरणांतील ५९८ कर्मचाऱ्यांना या तरतुदीचा लाभ देण्यात आला आहे. ही माहिती अपूर्ण असल्यामुळे हे आकडे यापेक्षा मोठे आहेत हे स्पष्ट होते.उत्तर उमरेड भागातील पाचगाव वनक्षेत्रात २००२ ते २०१२ या कालावधीत गिट्टीचे अवैध उत्खनन झाले. त्यामुळे सरकारचा २ कोटी ७५ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल बुडाला. या घोटाळ्यात आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाई झाल्याचे एका प्रकरणात निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य सचिवांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.विभागनिहाय आकडेवारीविभाग                                 प्रकरणे                     कर्मचारीजल संसाधन                          ३६                              १२४महसूल व वन                        ५०                               १०६गृह                                        ७४                              ८१पीडब्ल्यूडी                            ३०                              ४७नियोजन                               २३                               ४३कृषी व संलग्न                        १३                               ३५पाणी पुरवठा                        १३                                 ३४सार्वजनिक आरोग्य              २४                                ३०ग्राम विकास                         १७                                २२शालेय शिक्षण                     ०८                                १७सामाजिक न्याय                ०४                                   १४नगर विकास                     ०९                                 १०कौशल्य विकास                 ११                                  १०उच्च शिक्षण                      ०१                                   १०अन्न व नागरी पुरवठा         ०४                                  ०६वित्त                                  ०४                                 ०४सहकार व पणन                ०२                                  ०२सामान्य प्रशासन               ०१                                   ०१आदिवासी विकास           ०१                                    ०१वैद्यकीय शिक्षण               ०१                                  ०१------------------------------------------एकूण                            ३२६                                ५९८------------------------------------------

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी