शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

धक्कादायक! ६०० घोटाळेबाज कर्मचाऱ्यांवर झाली नाही कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 21:09 IST

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.

ठळक मुद्देहायकोर्टात आकडेवारी सादर : चार वर्षावर विलंबाचा मिळाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमातील तरतुदीमुळे गेल्या पाच वर्षांत ५९८ घोटाळेबाज सरकारी कर्मचारी कारवाईच्या पाशातून सुटले आहेत. शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करण्यास झालेल्या चार वर्षांवर विलंबाचा फायदा त्यांना मिळाला आहे. राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही धक्कादायक माहिती दिली. सदर माहिती अपूर्ण असल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाचे संरक्षण मिळालेल्या घोटाळेबाज कर्मचाऱ्यांचा आकडा यापेक्षा मोठा आहे हे येथे उल्लेखनीय.आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध, तो सेवानिवृत्त झाल्यावर, चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी घडलेल्या घोटाळ्यामध्ये शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येणार नाही अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम-१९८२ मधील २७ व्या नियमात करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध तो सेवेत असतानाच शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई सुरू करणे आवश्यक आहे. त्यात विलंब होऊन नियम २७ मधील तरतूद लागू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची व न्यायिक कारवाई करता येत नाही. मुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत विविध विभागांमधील घोटाळ्याच्या ३२६ प्रकरणांतील ५९८ कर्मचाऱ्यांना या तरतुदीचा लाभ देण्यात आला आहे. ही माहिती अपूर्ण असल्यामुळे हे आकडे यापेक्षा मोठे आहेत हे स्पष्ट होते.उत्तर उमरेड भागातील पाचगाव वनक्षेत्रात २००२ ते २०१२ या कालावधीत गिट्टीचे अवैध उत्खनन झाले. त्यामुळे सरकारचा २ कोटी ७५ लाख ३४ हजार रुपयांचा महसूल बुडाला. या घोटाळ्यात आरोपी कर्मचाऱ्यांविरुद्ध भेदभावपूर्ण कारवाई झाल्याचे एका प्रकरणात निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. यात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुख्य सचिवांनी हे प्रतिज्ञापत्र दाखल केले. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.विभागनिहाय आकडेवारीविभाग                                 प्रकरणे                     कर्मचारीजल संसाधन                          ३६                              १२४महसूल व वन                        ५०                               १०६गृह                                        ७४                              ८१पीडब्ल्यूडी                            ३०                              ४७नियोजन                               २३                               ४३कृषी व संलग्न                        १३                               ३५पाणी पुरवठा                        १३                                 ३४सार्वजनिक आरोग्य              २४                                ३०ग्राम विकास                         १७                                २२शालेय शिक्षण                     ०८                                १७सामाजिक न्याय                ०४                                   १४नगर विकास                     ०९                                 १०कौशल्य विकास                 ११                                  १०उच्च शिक्षण                      ०१                                   १०अन्न व नागरी पुरवठा         ०४                                  ०६वित्त                                  ०४                                 ०४सहकार व पणन                ०२                                  ०२सामान्य प्रशासन               ०१                                   ०१आदिवासी विकास           ०१                                    ०१वैद्यकीय शिक्षण               ०१                                  ०१------------------------------------------एकूण                            ३२६                                ५९८------------------------------------------

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी