शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

धक्कादायक; दीर-वहिनीची खाणीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2022 18:57 IST

Nagpur News एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या दीर व वहिनीने समाजाच्या भयाने खड्ड्यातील पाण्यात उडी मारून जीव दिल्याची घटना रामटेक तालुक्यात घडली.

ठळक मुद्देरामटेक तालुक्यातील भीमनटाेला येथील घटना दाेघेही ९ जूनपासून हाेते बेपत्ता

नागपूर : दीर आणि वहिनी यांच्यात प्रेमाचे सुत जुळले आणि दाेघेही ९ जून राेजी घरून निघून गेले. ते बेपत्ता असल्याची तक्रारही पाेलिसात नाेंदविण्यात आली. त्यातच भंडारबाेडी (ता. रामटेक) गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनटाेला गावालगत असलेल्या मॅग्नीज खाणीच्या खाेल खड्ड्यातील पाण्यात गुरुवारी (दि. ७) सकाळी दाेघांचाही मृतदेह तरंगताना आढळून आला. दाेघांनीही बुधवारी (दि. ६) खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

लक्ष्मण गुलाबराव धुर्वे (२७) व मैनावती असुराज धुर्वे (३८) दाेघेही रा. भीमनटाेला, ता. रामटेक अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्यात सख्खे चुलत दीर व वहिनीचे नाते असल्याच माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली असून, पाेलिसांनी याला दुजाेरा दिला आहे. दाेघेही ९ जून राेजी घराबाहेर पडले हाेते. त्यानंतर ते घरी परत न आल्याने आसुराज धुर्वे याने मैनावतीचा सर्वत्र शाेध घेतला. ही कुठेही आढळून न आल्याने त्याने मैनावती बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली हाेती.

दरम्यान, दाेघेही बुधवारी (दि. ६) भीमनटाेला येथे परत आले हाेते. समाज आपल्याला स्वीकारणार नसल्याची जाणीव आल्याने दाेघेही गावालगतच्या मॅग्नीज खाणीच्या खड्ड्याजवळ गेले. दाेघांनीही त्यांच्या बॅग, चप्पल व माेबाइल फाेन खड्ड्याच्या काठावर ठेवले आणि पाण्यात उडी घेतली. मैनावतीचा मृतदेह बुधवारी सायंकाळी तर लक्ष्मणचा मृतदेह गुरुवारी सकाळी मृतदेह तरंगताना आढळून आल्याने नागरिकांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह बाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास पाेलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार करीत आहेत.

लक्ष्मण अविवाहित तर आसुराजचे दुसरे लग्न

लक्ष्मण धुर्वे हा अविवाहित असून, मैनावतीचा पती आसुराज धुर्वे याचे दुसरे लग्न हाेय. आसुराजच्या पहिल्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने आसुराजने मैनावतीशी दुसरे लग्न केले. आसुराजला पहिल्या पत्नीपासून तीन मुली तर मैनावतीपासून एक आठ वर्षाचा मुलगा आहे. लक्ष्मण व मैनावतीचे प्रेमसंबंध हाेते. दाेघेही गावाला परत आल्यानंतर समाज आपल्याला स्वीकारणार नाही, अशी भीती त्यांना वाटत हाेती.

टॅग्स :Deathमृत्यू