शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 17, 2023 21:22 IST

Nagpur News सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत.

नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु, सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी महानगरपालिका अधिकाऱ्यांविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्याचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण व पर्यावरणाची हानी हे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

वर्धा रोड ते विमानतळ, विमानतळ टी-पॉईंट ते आरबीआय चौक, रहाटे कॉलनी टी-पॉईंट ते दीक्षाभूमी, अलंकार चौक ते जीपीओ चौक आणि आरबीआय चौक ते तेलंगखेडी उद्यान व फुटाळा तलाव रोडवरील दोन्ही बाजूच्या झाडांवर रोषणाई करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केला जात आहे. विविध प्रकारचे लाइट लावण्याकरिता झाडांना खिळे ठोकण्यात आले आहेत. काही पर्यावरणप्रेमींनी झाडांचे निरीक्षण केले असता प्रत्येक झाडांना सुमारे ३० खिळे ठोकले गेल्याचे व फांद्याही तोडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये सिव्हिल लाइन्स येथील अनेक हेरिटेज झाडांचासुद्धा समावेश आहे.

२०२१ मध्ये पर्यावरण संवर्धन संस्थांच्या मागणीमुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झाडांना ठोकलेले खिळे व बॅनर्स काढण्यासाठी मोहीम राबविली होती. तसेच, खिळे ठोकणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. असे असताना ही बेकायदेशीर कृती करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची, तसेच किती पक्षांची घरटी नष्ट करण्यात आली, हेदेखील शोधून काढण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना बुरशी लागते. त्यामुळे झाडे वाळू शकतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय