शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

धक्कादायक! सी-२० परिषदेच्या रोषणाईसाठी तीन हजार झाडांना ठोकले एक लाखावर खिळे

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: March 17, 2023 21:22 IST

Nagpur News सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत.

नागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची काळजी घेणे आवश्यक आहे; परंतु, सी-२० परिषदेची तयारी करीत असलेल्या प्रशासनाने झाडांना इजा पोहोचविणारी धक्कादायक कृती केली आहे. शहरात रोषणाई करण्यासाठी सुमारे तीन हजार झाडांना तब्बल एक लाखावर खिळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी महानगरपालिका अधिकाऱ्यांविरुद्ध वृक्ष संवर्धन कायद्याचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण व पर्यावरणाची हानी हे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

वर्धा रोड ते विमानतळ, विमानतळ टी-पॉईंट ते आरबीआय चौक, रहाटे कॉलनी टी-पॉईंट ते दीक्षाभूमी, अलंकार चौक ते जीपीओ चौक आणि आरबीआय चौक ते तेलंगखेडी उद्यान व फुटाळा तलाव रोडवरील दोन्ही बाजूच्या झाडांवर रोषणाई करण्यासाठी २० कोटी रुपये खर्च केला जात आहे. विविध प्रकारचे लाइट लावण्याकरिता झाडांना खिळे ठोकण्यात आले आहेत. काही पर्यावरणप्रेमींनी झाडांचे निरीक्षण केले असता प्रत्येक झाडांना सुमारे ३० खिळे ठोकले गेल्याचे व फांद्याही तोडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये सिव्हिल लाइन्स येथील अनेक हेरिटेज झाडांचासुद्धा समावेश आहे.

२०२१ मध्ये पर्यावरण संवर्धन संस्थांच्या मागणीमुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी झाडांना ठोकलेले खिळे व बॅनर्स काढण्यासाठी मोहीम राबविली होती. तसेच, खिळे ठोकणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. असे असताना ही बेकायदेशीर कृती करण्यात आली. त्यामुळे यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची, तसेच किती पक्षांची घरटी नष्ट करण्यात आली, हेदेखील शोधून काढण्याची गरज आहे, असे बोलले जात आहे. खिळे ठोकल्यामुळे झाडांना बुरशी लागते. त्यामुळे झाडे वाळू शकतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय