शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मुसळधार पावसाने झालेले प्रचंड नुकसान पाहून धक्का बसलेल्या शेतकऱ्याने केले विषप्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 21:59 IST

Nagpur News सततच्या मुसळधार पावसामुळे पिकाचे झालेले प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

नागपूर : सततच्या मुसळधार पावसामुळे पिकाचे झालेले प्रचंड नुकसान पाहून हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदागाेमुख येथे मंगळवारी (दि. २) सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

फनिंद्र खेमराज मिलमिले (५०, रा. नांदागाेमुख, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे शेती असून, ती शेती त्याच्या आईच्या नावे आहे. त्याचे संयुक्त कुटुंब असल्याने शेतीचे सर्व व्यवहार व शेतीची कामे फनिंद्रच करायचा. त्याने यावर्षी शेतात कपाशीची लागवड केली हाेती. सततच्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले व पीक खराब हाेण्याच्या मार्गावर हाेते.

ताे चार दिवसांपूर्वी पंचमढी (मध्य प्रदेश) येथे नागद्वार यात्रेला गेला हाेता. यात्रेवरून नुकताच परत आला आणि मंगळवारी सकाळी पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेला हाेता. पिकाची स्थिती विदारक दिसताच ताे घरी परत आला आणि कुणाचेही लक्ष नसताना विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच पत्नी संगीताने त्याला सावनेर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास ठाणेदार अमितकुमार आत्राम व रवींद्र चटप करीत आहेत.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या