शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

सौर ऊर्जेला झटका; आता ५० मेगावॅटसाठीच सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 17:58 IST

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा अजब निर्णय : शुद्धीपत्रक जारीराज्यात नागरिकांचे १७५ कोटींच्या सबसिडीचे नुकसान

कमल शर्मा

नागपूर : कोळशाचा तुटवडा आणि औष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जगात गैर पारंपरिक ऊर्जा वाढविण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. पण, महाराष्ट्रात गंगा उलटी वाहत असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. कंपनीच्या या अजब निर्णयामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

सोलर रूफ टॉप लावण्यासाठी केंद्र सरकार ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी देते, हे उल्लेखनीय. सन २०१९ मध्ये २५ मेगावॅट क्षमतेपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय झाला. पण, केवळ ०.२५ टक्के सबसिडीचा फायदा नागरिकांना मिळत आहे. केंद्र सरकारची एजन्सी एमएनआरईने यानंतरही महाराष्ट्राला ५०० मेगावॅटची ऑफर दिली, पण महावितरणने ३०० मेगावॅट सोडून दिले. केवळ २०० मेगावॅटचे सोलर रूफ टॉप लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीने या संदर्भात निविदासुद्धा मागविली, पण एका आठवड्यातच कंपनीने सोमवारी रात्री शुद्धीपत्रक जारी केले. यानुसार कंपनी २०० मेगावॅट नव्हे तर केवळ ५० मेगावॅटकरिताच सबसिडी देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे सबसिडीचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान आणखी वाढले आहे.

आगाऊ रक्कम मिळणार नाही

मागील लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर योजनेला क्रियान्वित करण्यासाठी राज्याला ३० टक्के रक्कम आगाऊ मिळेल, असे एमएनआरईने ३ सप्टेंबर २०१९ ला आदेश जारी करून स्पष्ट केले होते. पण, महाराष्ट्राने मागील लक्ष्य पूर्ण केलेले नाही. या कारणामुळे राज्याला कोणतीही आगाऊ रक्कम देण्यात येणार नाही.

टॅग्स :Governmentसरकारelectricityवीज