शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

सौर ऊर्जेला झटका; आता ५० मेगावॅटसाठीच सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 17:58 IST

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा अजब निर्णय : शुद्धीपत्रक जारीराज्यात नागरिकांचे १७५ कोटींच्या सबसिडीचे नुकसान

कमल शर्मा

नागपूर : कोळशाचा तुटवडा आणि औष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जगात गैर पारंपरिक ऊर्जा वाढविण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. पण, महाराष्ट्रात गंगा उलटी वाहत असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. कंपनीच्या या अजब निर्णयामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

सोलर रूफ टॉप लावण्यासाठी केंद्र सरकार ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी देते, हे उल्लेखनीय. सन २०१९ मध्ये २५ मेगावॅट क्षमतेपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय झाला. पण, केवळ ०.२५ टक्के सबसिडीचा फायदा नागरिकांना मिळत आहे. केंद्र सरकारची एजन्सी एमएनआरईने यानंतरही महाराष्ट्राला ५०० मेगावॅटची ऑफर दिली, पण महावितरणने ३०० मेगावॅट सोडून दिले. केवळ २०० मेगावॅटचे सोलर रूफ टॉप लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीने या संदर्भात निविदासुद्धा मागविली, पण एका आठवड्यातच कंपनीने सोमवारी रात्री शुद्धीपत्रक जारी केले. यानुसार कंपनी २०० मेगावॅट नव्हे तर केवळ ५० मेगावॅटकरिताच सबसिडी देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे सबसिडीचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान आणखी वाढले आहे.

आगाऊ रक्कम मिळणार नाही

मागील लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर योजनेला क्रियान्वित करण्यासाठी राज्याला ३० टक्के रक्कम आगाऊ मिळेल, असे एमएनआरईने ३ सप्टेंबर २०१९ ला आदेश जारी करून स्पष्ट केले होते. पण, महाराष्ट्राने मागील लक्ष्य पूर्ण केलेले नाही. या कारणामुळे राज्याला कोणतीही आगाऊ रक्कम देण्यात येणार नाही.

टॅग्स :Governmentसरकारelectricityवीज