शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

चारसौ चालीस का झटका; ३५ कुटुंबांना प्रत्येकी चार लाख 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2022 19:39 IST

Nagpur News पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात दोन वर्षात ३५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला आहे.

 

नागपूर : पावसाळ्यात वीज शॉक लागू मृत्यूच्या घटना वाढतात. गेल्या दोन वर्षांतील आकडेवारीचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यात दोन वर्षात ३५ जणांचा मृत्यू वीज पडून झाला आहे. यात गेल्या वर्षी २१ जणांचा तर यंदा आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू हा विजेने झाला आहे. या सर्वांच्या वारसांना चार लाखाचे अनुदान मिळाले आहे.

पावसाळ्यात नैसर्गीक आपत्तीसह वीज पडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतात. या घटना प्रामुख्याने जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात घडत असतात. यातही सर्वाधिक वीज पडून मृत्यूच्या घटना या शेतात होत असल्याचे दिसून येते. मागील दोन वर्षात ३६ जणांना वीज पडून आपला जीव गमवावा लागला. प्रशासन स्तरावर अशा सर्वांच्या वारसांना नुकसान भरपाई प्रदान करण्यात आल्याचे सांगितले जाते. यासोबत वीज पडल्याने जखमी होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. दोन वर्षात तब्बल २९ जण यात जखमी झाले आहेत.

२०२१ मध्ये २१ मृत्यू

मागच्या वर्षी २०२१ मध्ये नैसर्गीक आपत्तीमुळे एकूण २७ जणांचा मृत्यू झाला. यापैकी २१ जणांचा मृत्यू हा वीज पडून झाला. ५ जण पुरात वाहून गेले. तर एक जण भिंत पडून मरण पावला.

२०२२ मध्ये १४ मृत्यू

२०२२ मध्ये १ जूनपासून १७ ऑगस्टपर्यंत १४ जणांचा वीज पडून मृत्यू झाल्याची शासन दरबारी नोंद आहे.

१४२ जनावरांचा मृत्यू

नैसर्गीक आपत्तीमुळे एकूण १४२ जनावरांचाही मृत्यू झाला. यात बकरीपासून तर गायीपर्यंत सर्व प्रकारच्या जनावरांचा समावेश आहे. यासोबत ३१० कोंबड्याही मृत्यूमुख पडल्याची नोंद आहे. कोंबड्यांच्या मृत्युंची संख्या यापेक्षा कितीतरी मोठी असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नियमानुसार ३ हजारापासून तर ३० हजारापर्यंतच्या जनावरांसाठीची मदत देण्यात आलेली आहे. तसेच कोंबड्यांचीही मदत वितरित झाल्याचे सांगितले जाते.

पावसाळ्यात घ्या काळजी

- वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच किंवा सुरक्षतेच्या ठिकाणी राहा

- शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नका

- वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक उपकरणे बंद ठेवावी

- अतिवृष्टी व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नका

- चार चाकी वाहनामध्ये असाल तर दारे खिडक्या पूर्ण बंद ठेवा व धातू असलेल्या वाहनाच्या भागाला स्पर्ष करू नका.

टॅग्स :Deathमृत्यू