शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

शिवसेनेला हिंदी समजत नाही - श्रीहरी अणे

By admin | Updated: June 19, 2016 08:09 IST

मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे.

श्रीहरी अणे यांचा आरोप : शेतकऱ्यांना हवी मदतनागपूर : मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे, अशी शिवसेना-मनसेची भूमिका आहे परंतु हिंदी भाषिकांची अनेक राज्ये आहेत. विदर्भातील भाषा मराठी-हिंदी आहे. शिवसेनेला हिंदी भाषा येत नसल्याने शिवसेना संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप विदर्भवादी नेते व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी शनिवारी केला. राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीतर्फे जय जलाराम मंगल कार्यालयात आोयोजित वेगळ्या विदर्भ राज्यासाठीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर व्हीकॅनचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ, जनसुराज्यचे अध्यक्ष राजेश काकडे, विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील संन्याल, प्रकाश निमजे, चंद्रभान रामटेके, महिला शहर अध्यक्ष ज्योती गांधी, शहराध्यक्ष हरेश निमजे, योगीराज वाहने आदी उपस्थित होते. शिवसेनेचा आज ५० वा वर्धापन दिन आहे. अणे यांनी केलेल्या या बोच-या टीकेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे आता लक्ष लागले आहे. 

शिवसेना-मनसेची भूमिका मराठी भाषिकांचे एकच राज्य असावे अशी आहे परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याला ६० वर्षापूर्वीच उत्तर दिले आहे. ही कल्पनाच चुकीची असून विदर्भातील लोकांना मराठीइतकीच हिंदी भाषा सोपी वाटते. शिवसेनेचे म्हणणे विचारात घेतले तर त्यांना इतिहास माहीत नसल्याचे दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य व त्यानंतर पेशव्याचे राज्य देशाच्या ६० टक्के भूभागावर होते. त्यामुळे मराठी माणसाचे एक राज्य ही कल्पनाच चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यापूर्वीची विदर्भाची मागणी आहे. लोकनायक बापुजी अणे यांनी सी.पी.अ‍ॅन्ड बेरार राज्य बरखास्त करू नका, अशी भूमिका मांडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही विदर्भासह छोट्या संघ राज्याचे समर्थन केले होते. त्यांनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व मुंबई (केंद्रशासित) राज्ये व्हावे, अशी भूमिका मांडली होती. संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर मुंबई महाराष्ट्रात राहावी, यासाठी हुतात्मे झाले होते. तसेच स्वंतत्र विदर्भासाठीही हुतात्मे झाले असल्याचे अणे यांनी निदर्शनास आणले.

आजवर विदर्भातील साडेचार मुख्यमंत्री झाले. यात नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री म्हणजे अर्धे मुख्यमंत्री होते. परंतु विदर्भाला न्याय मिळालेला नाही. दांडेकर समितीने विदर्भाच्या मागासलेपणाची कारणे दिली होती. राज्यक र्त्यांनी विदर्भाचा निधी पश्चिम महाराष्ट्राकडे वळता केला होता. विदर्भ -मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी ९० टक्के निधी उपलब्ध केला परंतु कामे १५ टक्केच झालेली आहेत. हा पैसा जिरवणारे शोधून त्यांना शिक्षा व्हावी, असे मत अणे यांनी मांडले. यावेळी राजेश काकडे, चंद्रभान रामटेके, प्रकाश निमजे, नंदकिशोर रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी )शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो महत्त्वाची?गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक आत्महत्या होण्याची चिन्हे आहेत. शासनाने थकीत कर्जाचा विचार न करता शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करावे. शेतकरी ही रक्कम परत करू न शकल्यास शासनाने ती करावी. परंतु सरकाची मानसिकता नाही. शेतकऱ्यांना पैसा देण्यापेक्षा मेट्रो रेल्वे, इंटरनॅशननल हब महत्त्वाचा वाटतो. शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो महत्त्वाची आहे का असा सवाल असे यांनी केला.विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी बापुजी अणे यांनी यवतमाळात ‘लोकमत’ सुरू केला होता. परंतु पुढे स्वातंत्र्य संग्राम सैनिक जवाहरलाल दर्डा यांनी लोकमत राष्ट्रीय स्तरावर पोहचविला. मध्यप्रदेशातही हिंदी-मराठी बोलणारे होते, असे श्रीहरी अणे म्हणाले.