शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे नागपुरात खातेच उघडणार नाही

By admin | Updated: February 17, 2017 22:11 IST

उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला नागपुरात कुणी विचारत नाही.

 शिवसेनेचे नागपुरात खातेच उघडणार नाही

मुख्यमंत्री : राष्ट्रवादी केलेल्या गुंतवणूकीनंतर मुद्दलही मिळत नाही
 
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूकांच्या रिंगणात शिवसेनेसारखे जम नसलेले पक्षही उतरले आहेत.निवडणूकीत मत देणे विकासासाठी गुंतवणूक करणे असते. उद्धव-आदित्य ठाकरेंच्या पक्षाला नागपुरात कुणी विचारत नाही. त्यांच्या पक्षरुपी बँकेचे नागपुरात खातेही उघडणार नाही, या शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. शुक्रवारी सलग दुसºया दिवशी त्यांनी नागपुरातील विविध भागांत प्रचारसभा घेतल्या.
दक्षिण नागपुरातील मानवता हायस्कूल, छोटा ताजबाग चौक, नंदनवन तसेच बांग्लादेश परिसरात त्यांनी प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांत खा.डॉ.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 
गुंतवणूक करताना चांगल्या बँकेत केल्यास त्याचा परतावाही चांगला मिळतो. मतांच्या बाबतीतही हेच धोरण असायला हवे. भाजपारूपी बँकेत मतांची गुंतवणूक केल्यास ५ वर्षात ५ पट विकासाची १०० टक्के खात्री आहे. कॉंग्रेसमध्ये तर भांडणच सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मतांची गुंतवणूक केल्यानंतर तेथून मुद्दलदेखील परत मिळत नाही.  काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही दिवाळखोर पक्ष असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भाजपाने सत्ता आल्यानंतरच खºया अर्थाने सामाजिक न्याय घडवून आणला आहे. कॉँग्रेसने इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी एवढ्या वर्षे सत्तेत असताना मोकळी करून दिली नाही. आम्ही इंदू मिलच्या जागेचा प्रश्न चुटकीसरशी सोडविला.  एवढेच नाही तर लंडन येथील बाबासाहेबांचे स्मारक, चैत्यभूमीचा विकास, दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र/पर्यटनाचा दर्जा, जपानमधील विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचे कार्य आम्ही केले आहे, असेदेखील ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाने नागपुरात केलेल्या विकासकामांचा पाढाच वाचला. 
 
कॉंग्रेसचा सामाजिक न्याय ही ‘बोलाचीच कढी’
यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसवरदेखील हल्लाबोल केला. भाषणातून सामाजिक न्यायाच्या बाता करणाºया काँग्रेसने सामाजिक न्याय आपल्या कृतीत कधीच उतरविला नाही. पक्षातील नेते आपापसांत भांडणे करण्यात व एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहे. ज्यांना पक्ष सांभाळल्या जात नाही, ते काय नागरिकांचा विकास करणार, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.