शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

उपराजधानीत शिवसेना अस्वस्थ, भाजप उत्साहात; गडकरी दिल्लीत, तुमाने मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 20:55 IST

Nagpur News नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली.

ठळक मुद्देजयस्वाल यांचा मध्यस्थीचा दावा

नागपूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. पक्षाचे नेते काहीही बोलण्यास टाळत आहेत. दुसरीकडे, बंडाची धार तीव्र झाल्याने भाजपने मंगळवारी विधान परिषदेतील विजयाचा जल्लोष अधिक जोमाने साजरा केला.

मंगळवारी सकाळी शिंदे यांच्या बंडखोरीचे वृत्त आल्यानंतर भाजपचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून मुंबईला रवाना झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिल्लीत बोलाविण्यात आले. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले.

वाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहे : जयस्वाल

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते दोनदा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. आताही शिवसेनेशी जवळीक कायम आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते अयोध्येलाही गेले होते. पक्षाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतात. अशा स्थितीत त्याच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला आपण उपस्थित राहिल्याचे जयस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिंदे यांची बंडखोरी शमवली जावी आणि पक्ष एकसंध राहावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाशी सोबत असल्याचे वृत्त आहे.

आशिष देशमुख यांनी पटोले यांच्या राजीनाम्याची केली मागणी

बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसमधीलही असंतोष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याने माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, चंद्रकांत हंडोरे हे दलित समाजाचे आहेत. त्यांना प्रथम क्रमांकाचे उमेदवार करण्यात आले. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्याच्या तपासासाठी ‘हायकमांड’ने चौकशी पथक पाठवावे. ते म्हणाले की, आमदारांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.

भाजपचा जल्लोष

विधान परिषद निवडणुकीत ५ जागांवर विजय नोंदवल्यानंतर शहर भाजपने टिळक पुतळा चौकात जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटली. शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके म्हणाले की, भाजपची इच्छा असेल तर अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतही विजयी होऊ शकतात. मात्र, पक्षाने पाच जागांवर समाधान व्यक्त केले. आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, संजय अवचट, दीपराज पार्डीकर, नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, बापू चिखले, बाल्या बोरकर, राम अंबुलकर, सुनील मित्रा, भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा