शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

उपराजधानीत शिवसेना अस्वस्थ, भाजप उत्साहात; गडकरी दिल्लीत, तुमाने मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2022 20:55 IST

Nagpur News नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली.

ठळक मुद्देजयस्वाल यांचा मध्यस्थीचा दावा

नागपूर : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेनेचे असंतुष्ट आमदार सुरतला पोहोचल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली. तर, शहर शिवसेनेत अस्वस्थता पसरली. पक्षाचे नेते काहीही बोलण्यास टाळत आहेत. दुसरीकडे, बंडाची धार तीव्र झाल्याने भाजपने मंगळवारी विधान परिषदेतील विजयाचा जल्लोष अधिक जोमाने साजरा केला.

मंगळवारी सकाळी शिंदे यांच्या बंडखोरीचे वृत्त आल्यानंतर भाजपचे नेतृत्व करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीहून मुंबईला रवाना झाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिल्लीत बोलाविण्यात आले. योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले.

वाद संपवण्याचा प्रयत्न करीत आहे : जयस्वाल

रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी ते दोनदा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. आताही शिवसेनेशी जवळीक कायम आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत ते अयोध्येलाही गेले होते. पक्षाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतात. अशा स्थितीत त्याच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला आपण उपस्थित राहिल्याचे जयस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिंदे यांची बंडखोरी शमवली जावी आणि पक्ष एकसंध राहावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिंदे गटाशी सोबत असल्याचे वृत्त आहे.

आशिष देशमुख यांनी पटोले यांच्या राजीनाम्याची केली मागणी

बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसमधीलही असंतोष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याने माजी आमदार आशिष देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते म्हणाले की, चंद्रकांत हंडोरे हे दलित समाजाचे आहेत. त्यांना प्रथम क्रमांकाचे उमेदवार करण्यात आले. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्याच्या तपासासाठी ‘हायकमांड’ने चौकशी पथक पाठवावे. ते म्हणाले की, आमदारांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे.

भाजपचा जल्लोष

विधान परिषद निवडणुकीत ५ जागांवर विजय नोंदवल्यानंतर शहर भाजपने टिळक पुतळा चौकात जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटली. शहराध्यक्ष, आमदार प्रवीण दटके म्हणाले की, भाजपची इच्छा असेल तर अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोतही विजयी होऊ शकतात. मात्र, पक्षाने पाच जागांवर समाधान व्यक्त केले. आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, संजय अवचट, दीपराज पार्डीकर, नीता ठाकरे, अश्विनी जिचकार, बापू चिखले, बाल्या बोरकर, राम अंबुलकर, सुनील मित्रा, भोजराज डुंबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपा