शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नेत्यांच्या शिफारस पत्रांवर मिळाले शिवभोजन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:06 IST

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेत अनेक लाभार्थींनी खोटी कागदपत्रे जोडून केंद्र लाटल्याची माहिती ...

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेत अनेक लाभार्थींनी खोटी कागदपत्रे जोडून केंद्र लाटल्याची माहिती उघडकीस आली आहे. केंद्रासाठी अर्ज न करताही नेते व मंत्र्यांच्या केवळ शिफारसपत्राच्या आधारावर शिवभोजन केंद्रासाठी ते पात्र ठरले आहेत. २३ एप्रिल व १४ मे २०२१ रोजी मंजूर करण्यात आलेल्या शिवभोजन केंद्राच्या यादीत हा घोळ झाला आहे. विशेष म्हणजे ज्या महिला बचत गटांनी या योजनेसाठी अर्ज करून सर्व निकष पूर्ण केले होते, त्यांना मात्र अपात्र ठरविण्यात आले आहे.

विशेष म्हणजे अर्ज सादर करतेवेळी संबंधित संस्था, व्यक्ती अथवा बचत गटाला जागा, अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना, गुमास्ता आदी कागदपत्रे सादर करायची आहेत. परंतु केंद्रासाठी मंजुरी देताना अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची तपासणी केली नसल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. नागपूर शहरातील काही लाभार्थींनी खोटे अनुभव पत्र जोडून या योजनेचा लाभ मिळवला, तर काही लाभार्थींनी खोटे भाडे करारपत्र जोडले आहे.

- एकाच घरात चार केंद्र

या योजनेत मंजूर झालेल्या लाभार्थींमध्ये एका कुटुंबाला चार विविध संस्थांच्या नावावर शिवभोजन केंद्र मंजूर झालेले आहे. यात पतीच्या नावावर एक, पत्नीच्या नावावर दोन केंद्र आहे, तर घरातीलच एका सदस्याच्या नावावर सुद्धा एक केंद्र मंजूर झाले आहे.

- स्वत:च्या शाळेत माध्यान्ह भोजन वाटप करीत असल्याचे प्रमाणपत्र

एका महिला बचत गटाच्या प्रमुखाने शिवभोजन केंद्र मिळविताना त्यांनी स्वत:च्याच शाळेत माध्यान्ह भोजन कामाचा अनुभव असल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडले आहे. त्यांच्या केंद्रासाठी मंत्र्यांची शिफारस आहे.

- अर्ज न करताच केंद्र मंजूर

२३ एप्रिल २०२१ च्या यादीत मंजूर केलेल्या दोन शिवभोजन केंद्रांसाठी संबंधित व्यक्तीने अर्जच केला नसल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले आहे. तसेच १४ मे २०२१ रोजी मंजूर झालेल्या एका बचत गटाने सुद्धा अर्ज केलेला नाही. याशिवाय अर्ज सादर करतेवेळी अटी व शर्तींची पूर्तता केली नाही, अशा लोकांनाही पात्र केले आहे. काहींकडे अन्न व औषधी विभागाचा परवाना नसून फक्त नोंदणी प्रमाणपत्र आहे.

- मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

माहिती अधिकार कार्यकर्ता व समाजसेविका रत्नमाला मेश्राम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व प्रकरणाची तक्रार केली आहे. शहरात मंजूर केलेल्या केंद्राच्या याद्या रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.