शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

२६/११ चा तपास करणारे शेंगळे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:57 IST

स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला,...

ठळक मुद्देसहायक पोलीस आयुक्तपदी रुजू

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जिवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले. देश हादरवून सोडणाºया या हल्ल्याच्या तपास करणारे तसेच हा हल्ला घडवून आणणारा क्रूरकर्मा, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर टांगण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे तत्कालीन तपास अधिकारी केशव सखाराम शेंगळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना २६/११ च्या आठवणी ताज्या केल्या.मूळचे मुंबईतील रहिवासी असलेले शेंगळे १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतरची सलग २७ वर्षे मुंबई पोलीस दलात सेवा देताना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाºया सांभाळल्या.९ जुलैला त्यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर नागपुरात बदली झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात रुजू होण्यासाठी आल्याचे कळाल्यानंतर लोकमतने त्यांना गाठले. २६/ ११ च्या आव्हानात्मक तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला.२६/११ चा हल्ला म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. हा हल्ला करणारा केवळ एक दहशतवादी जिवंत हाती लागला होता आणि केवळ ९० दिवसांत या हल्ल्याचा तपास पूर्ण करायचा होता. हे आव्हान आम्ही स्वीकारले होते. त्यासाठी मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वात मी आणि अन्य १० (एकूण १२) अधिकारी तसेच १५० कर्मचाºयांची चमू रात्रंदिवस तपास कामात गुंतली होती. मरण्याच्या तयारीनेच आलेला क्रूरकर्मा कसाब काही बोलायला तयार नव्हता. देश हादरवणाºया या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, हे सांगण्यासाठी तो आढेवेढे घेत होता. पोलिसांच्या चौकशीला टाळत होता. त्याच्या भाषेला पंजाबी टच होता. स्पष्ट हिंदी बोलत नसला तरी त्याला सारेच समजायचे. त्यामुळे तपास पथकाशी संबंधित पंजाबी महिलांकडून त्याची भाषा समजण्यास मदत होत होती. काहीही बोलायला, विचारायला गेलो की तुम्हारे पास पिस्तूल है... निकालो और मुझे शूट कर दो... मै घबराता नही... असे म्हणायचा. आम्ही जन्नतमध्ये जाण्यासाठीच भारतात आलो. त्याच्याजवळ बनावट आयडी प्रूफ होते. त्यामुळे तो जिवंत हाती लागला म्हणूनच पाकिस्तानी असल्याचे आणि या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे आपण सिद्ध करू शकलो. ९० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आव्हान होते. १२ अधिकारी आणि १५० कर्मचाºयांच्या तपास पथकांसह अनेक वरिष्ठांनी रात्रीचा दिवस करून हे आव्हान पेलले. त्या दिवसात कुणी झोपण्याची कल्पनाही करीत नव्हते अन् कुणाला झोपही येत नव्हती. तपासादरम्यानच्या थरारक अनुभवाने आजही अंगावर शहारे उभे राहतात. भक्कम पुराव्याची साखळी जोडल्या गेल्यामुळे कसाबला फासावर टांगता आले. भारतावर सर्वात मोठा हल्ला करणाºया पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर टांगण्यासाठी करण्यात आलेल्या तपास पथकात आपण खारीचा वाटा उचलला, ही आपल्यासाठी कायम अभिमानाची बाब राहणार आहे, असेही शेंगळे यांनी सांगितले.१६ निघाले, ६ परतले !२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखला गेल्यानंतर भारताकडे कसाबसह १६ पाकिस्तानी दहशतवादी निघाले. मात्र, त्यातील सहा जण वेगवेगळ्या कारणामुळे माघारी परतले. येथील हिंदू असो अथवा मुसलमान, छोटे मूल असो की वृद्ध, माणसं असो की जनावरं सारेच्या सारेच आमचे शत्रू आहेत, असे तो सांगत होता. त्यांना संपवण्यासाठीच आम्ही आलो. ‘मिशन संपल्यानंतर शेवटचा बॉम्बस्फोट घडवून स्वत:ही आत्मघात करण्याचा त्यांचा कट होता’, असे कसाबने अखेर तपास अधिकाºयांना माहिती देताना कबूल केले होते.