शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

२६/११ चा तपास करणारे शेंगळे नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:57 IST

स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला,...

ठळक मुद्देसहायक पोलीस आयुक्तपदी रुजू

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जिवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले. देश हादरवून सोडणाºया या हल्ल्याच्या तपास करणारे तसेच हा हल्ला घडवून आणणारा क्रूरकर्मा, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर टांगण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे तत्कालीन तपास अधिकारी केशव सखाराम शेंगळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना २६/११ च्या आठवणी ताज्या केल्या.मूळचे मुंबईतील रहिवासी असलेले शेंगळे १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतरची सलग २७ वर्षे मुंबई पोलीस दलात सेवा देताना त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाºया सांभाळल्या.९ जुलैला त्यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर नागपुरात बदली झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात रुजू होण्यासाठी आल्याचे कळाल्यानंतर लोकमतने त्यांना गाठले. २६/ ११ च्या आव्हानात्मक तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला.२६/११ चा हल्ला म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. हा हल्ला करणारा केवळ एक दहशतवादी जिवंत हाती लागला होता आणि केवळ ९० दिवसांत या हल्ल्याचा तपास पूर्ण करायचा होता. हे आव्हान आम्ही स्वीकारले होते. त्यासाठी मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वात मी आणि अन्य १० (एकूण १२) अधिकारी तसेच १५० कर्मचाºयांची चमू रात्रंदिवस तपास कामात गुंतली होती. मरण्याच्या तयारीनेच आलेला क्रूरकर्मा कसाब काही बोलायला तयार नव्हता. देश हादरवणाºया या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, हे सांगण्यासाठी तो आढेवेढे घेत होता. पोलिसांच्या चौकशीला टाळत होता. त्याच्या भाषेला पंजाबी टच होता. स्पष्ट हिंदी बोलत नसला तरी त्याला सारेच समजायचे. त्यामुळे तपास पथकाशी संबंधित पंजाबी महिलांकडून त्याची भाषा समजण्यास मदत होत होती. काहीही बोलायला, विचारायला गेलो की तुम्हारे पास पिस्तूल है... निकालो और मुझे शूट कर दो... मै घबराता नही... असे म्हणायचा. आम्ही जन्नतमध्ये जाण्यासाठीच भारतात आलो. त्याच्याजवळ बनावट आयडी प्रूफ होते. त्यामुळे तो जिवंत हाती लागला म्हणूनच पाकिस्तानी असल्याचे आणि या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे आपण सिद्ध करू शकलो. ९० दिवसांत तपास पूर्ण करण्याचे आव्हान होते. १२ अधिकारी आणि १५० कर्मचाºयांच्या तपास पथकांसह अनेक वरिष्ठांनी रात्रीचा दिवस करून हे आव्हान पेलले. त्या दिवसात कुणी झोपण्याची कल्पनाही करीत नव्हते अन् कुणाला झोपही येत नव्हती. तपासादरम्यानच्या थरारक अनुभवाने आजही अंगावर शहारे उभे राहतात. भक्कम पुराव्याची साखळी जोडल्या गेल्यामुळे कसाबला फासावर टांगता आले. भारतावर सर्वात मोठा हल्ला करणाºया पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर टांगण्यासाठी करण्यात आलेल्या तपास पथकात आपण खारीचा वाटा उचलला, ही आपल्यासाठी कायम अभिमानाची बाब राहणार आहे, असेही शेंगळे यांनी सांगितले.१६ निघाले, ६ परतले !२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखला गेल्यानंतर भारताकडे कसाबसह १६ पाकिस्तानी दहशतवादी निघाले. मात्र, त्यातील सहा जण वेगवेगळ्या कारणामुळे माघारी परतले. येथील हिंदू असो अथवा मुसलमान, छोटे मूल असो की वृद्ध, माणसं असो की जनावरं सारेच्या सारेच आमचे शत्रू आहेत, असे तो सांगत होता. त्यांना संपवण्यासाठीच आम्ही आलो. ‘मिशन संपल्यानंतर शेवटचा बॉम्बस्फोट घडवून स्वत:ही आत्मघात करण्याचा त्यांचा कट होता’, असे कसाबने अखेर तपास अधिकाºयांना माहिती देताना कबूल केले होते.