शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पैसे वाटणे ही भाजपची संस्कृती नाही; देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2023 21:01 IST

Nagpur News कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘निवडणुकीत पैसे वाटणे ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची संस्कृती आहे. भाजपची संस्कृती नाही,’ या शब्दात पलटवार केला.

ठळक मुद्देपराभवाच्या भीतीने लावताहेत आरोप

 

नागपूर : कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप होतोय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘निवडणुकीत पैसे वाटणे ही कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसची संस्कृती आहे. भाजपची संस्कृती नाही,’ या शब्दात पलटवार केला.

नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. फडणवीस म्हणाले, पोटनिवडणुकीमध्ये पराभव दिसून येत असल्याने महाविकास आघाडी घाबरली आहे. कसबामध्ये पैसे वाटल्याचा आरोप करून आघाडी मतदारांचा अपमान करीत आहे. भाजप कधीच पैसे वाटत नाही, लोकच पक्षाला जिंकवून आणतात. पराभवाच्या भीतीने आघीडी आरोप लावत आहे.

फडणवीस यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. औरंगाबाद व उस्मानाबाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर ते म्हणाले, काही लोकांना असे वाटते की, राज्यात जे काही होत आहे ते त्यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयामुळे होत आहे. काही लोकं तर असेही म्हणू शकतात की, त्यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला त्यानंतर हा निर्णय झाला. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. यापैकी सव्वा दोन वर्षे ते बंद दरवाज्यात होते. त्यामुळे उर्वरित दोन- तीन महिन्यात त्यांनी पूर्ण महाराष्ट्र बदलविला असेल, असे मला वाटत नाही.

नगरविकास व महसूल विभागाचीही अधिसूचना लवकरच

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने घेतला होता. आता केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे या शहरांचे नाव बदलले आहे. आता नगरविकास आणि महसूल विभागाची अधिसूचना जारी होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. यानंतर संपूर्ण जिल्हा, मनपा व नगरपालिकेचे नाव बदलेल. ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस