शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शरद पवार, उद्धव ठाकरेंना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही- देवेंद्र फडणवीस

By योगेश पांडे | Updated: May 12, 2023 16:12 IST

उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर शिंदे सरकार बचावले आणि राज्यात विविध राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. पवार व ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी करण्याचा अधिकारच नाही. जर उद्धव ठाकरे यांना निकाल त्यांच्या बाजूने आला असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल ढोल बडवावे, या शब्दांत फडणवीस यांनी टीका केली.

नागपुरात ते शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरत लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविली. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी विचार आणि इतके वर्ष जुनी युतीदेखील सोडली. आता ते कोणत्या नाकाने नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला. शरद पवार आणि नैतिकतेचा संबंध काय आहे असे विचारत पवारांनी भाजपला नैतिकता शिकविली तर कठीणच होईल. आम्हालादेखील इतिहासात जावे लागेल. वसंतरावांचे सरकार कसे गेले हे राज्याने पाहिले होते. पवार ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ नेते बोलत असतात, त्याकडे लक्ष द्यायचे नसते, असे फडणवीस म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने आता विधानसभा अध्यक्षांना सर्वाधिकार दिले आहेत. अध्यक्षांवर दबाव आणण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हे ‘फ्री ॲंड फेअर’ प्रक्रियेत हे बसत नाहीत. विधानसभा अध्यक्ष हे कुणाच्याही दबावाला बळी पडतील, असे मला वाटत नाही. ते स्वत: निष्णात वकील आहेत. जे कायद्यात व संविधानात आहे त्यानुसारचे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे