शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नागपुरातील शांतिनगर पोलीसांकडून व्यापाऱ्याला ८० हजाराची मागणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 21:23 IST

युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी : व्यापाऱ्याने केली गृहमंत्र्याकडे तक्रार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार करून धमकाविल्याचे प्रकरण शांत होण्यापूर्वीच शांतिनगर पोलीस पुन्हा एका वादात फसली आहे. एका व्यापाऱ्याला धमकावून ८० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप व्यापाऱ्याने थेट गृहमंत्र्याकडे केला आहे. युवतीच्या प्रकरणाशी संबंधित पीएसआय व त्याच्या साथीदारावरच व्यापाऱ्यानेही आरोप लावला आहे.१७ एप्रिल रोजी एका युवतीने पीएसआयवर आपत्तीजनक व्यवहार करून धमकावल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. बुधवारी याच पीएसआय सोबत ९ पोलीस कर्मचारीव एका दलाला विरुद्ध परिसरातील व्यापाऱ्याने ८० हजाराची मागणी केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ६० वर्षीय तैय्यबभाई चाम्पावाला यांची हार्डवेअरची दुकान आहे. १८ एप्रिलच्या सकाळी तैय्यब कर्मचाऱ्यांसोबत ग्रीन नेट लावत होते. त्यावेळी पोलीसांचे पथक तिथे पोहचले. पोलीसांनी तैय्यब व त्याच्या कर्मचाऱ्याला धमकावत, लॉकडाऊनमध्ये दुकान उघडल्याचा आरोप लावून मारहाण करू लागले. तैय्यबने शटर बंद असल्याचे सांगितल्यानंतरही पोलीस कर्मचाऱ्यांनी तैय्यब व त्यांच्या अजय नावाच्या कर्मचाऱ्याला गाडी बसविले. पोलीस त्यांना ठाण्यात न नेता डीबी कक्षात घेऊन गेले. तिथे लॉकडाऊनचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल न करण्याच्या बदल्यात ५ लाख रुपयांची मागणी केली. परिसरातील एक केबल संचालक तिथे पोहचला. त्याने तैय्यबला पैसे देण्याचा सल्ला दिला. दरम्यान तैय्यबचे नातेवाईक तिथे पोहचले. त्यांच्याकडून ८० हजार रुपये घेतल्यानंतर तैय्यबला सोडण्यात आले.पोलीसांच्या या कृत्यामुळे तैय्यब दहशतीत आले. त्याच दरम्यान त्यांना युवतीने केलेल्या तक्रारीची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी गृहमंत्र्याच्या कार्यालयाला तसेच वरिष्ठ अधिकारी व शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात शांतिनगर पोलीसांकडून पैशाची मागणी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. शांतिनगर परिसरातील एक केबल संचालक पोलीसांसाठी दलालीचे काम करतो. तो पोलीसांच्या माध्यमातून अवैध धंदेवाल्यांकडून वसूली करण्याबरोबरच मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतो. गेल्या काही महिन्यापासून एक पीएसआय शांतिनगर पोलीस ठाणे संचालित करीत आहे. त्याच्याप्रती नागरिकांमध्ये रोष आहे.

टॅग्स :ExtortionखंडणीNagpur Policeनागपूर पोलीस