शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

शहीद गोवारी स्मारक व्हावे ऐतिहासिक वारसास्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:24 IST

आदिवासी गोवारी बांधवांच्या बलिदानाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवारी बांधवांप्रमाणे त्यांच्या शहीद स्मारकालाही उपेक्षा सहन करावी लागत आहे.

ठळक मुद्देसमाज बांधवांकडून मागणी : वर्षे लोटूनही वाढला नाही स्मारकाचा निधी

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदिवासी गोवारी बांधवांच्या बलिदानाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवारी बांधवांप्रमाणे त्यांच्या शहीद स्मारकालाही उपेक्षा सहन करावी लागत आहे. देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूरच्या हृदयस्थानी असलेल्या झिरो माईल परिसरात हे स्मारक आहे खरे पण समाजाप्रमाणे तेही उपेक्षित आहे. त्या स्मारकाचे नुतनीकरण करावे, गोवारी समाजाच्या इतिहासाचे, संस्कृतीचे दर्शन होईल अशाप्रकारे विकासित करावे आणि ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित करावे, अशी मागणी समाजातील तरुणांकडून पुढे येत आहे.समाजातील तरुण कार्यकर्ते जीवन आंबुडारे यांनी समाजाकडून पुढे येणाऱ्या या मागणीबाबत आपली भूमिका मांडली. आदिवासी म्हणून उल्लेखित असलेल्या गोवारी समाजाचा एक स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्र संस्कृती आहे. मात्र पिढ्यान्पिढ्या अज्ञानी असलेल्या समाजाच्या संस्कृतीची कधी हवी तशी नोंद कुणी केली नाही किंवा कुणाकडून झालीही नाही. त्यामुळे या समाजाला बोगस आदिवासी ठरवून १९८५ साली त्यांच्या अस्तित्वाबाबत प्रश्न निर्माण केला गेला. याच गैरसमजामुळे लाखो गोवारी बांधवांना मोर्चा काढावा लागला आणि २३ नोव्हेंबर १९९४ सालचे ते हत्याकांडही घडले. ही खरेतर आमच्या समाजासाठी कलंकित घटना आहे. कदाचित इतिहास, संस्कृतीची नोंद झाली असती तर असा लढा द्यावा लागला नसता आणि अनेक पिढ्यांना अन्यायात जगावे लागले नसते. पण घडले ते घडून गेले, आतातरी ही चूक दुरुस्त व्हायला हवी.गोवारींचे शहीद स्मारक झिरो माईल चौक म्हणजे उपराजधानीच्या हृदयस्थानी आहे. मात्र समाजाच्या उपेक्षेप्रमाणे त्याचीही उपेक्षा, हेळसांड होत आहे. त्या घटनेनंतर शहिदांचे स्मारक झाल्यावर सुरुवातीला शासनाकडून संघटनेला शहीद स्मृतिदिनाच्या आयोजनासाठी एक लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खर्चाची तरतूद केली जाते. मात्र आज अनेक वर्षे लोटूनही या निधीत वाढ करण्यात आली नाही. स्मारकावर पाणी, सभामंडप, खुर्च्या, रंगरंगोटी अशा सुविधांचा अभाव आहे. २५ वर्षापासून शहीद स्मारकाचे दगडी शिल्प जीर्ण झाले आहे. त्यामुळे शासनाने शहीद बांधवांची आणि त्यांचा वारसा चालविणाऱ्या समाजाची अवहेलना थांबवावी, अशी अपेक्षा आंबुडरे यांनी व्यक्त केली. शासनाद्वारे इतर समूहांना झुकते माप देते. त्यांच्या स्मारक, समाजभवनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते मग गोवारी स्मारकाची अशी हेळसांड का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.या समस्येकडे तातडीने लक्ष घालून स्मारकाचे नुतनीकरण करावे. पाणी, बैठक व्यवस्था, सभामंडप, स्वच्छतागृह, प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.गोवारी समाजाच्या इतिहास, संस्कृतीचे व्हावे दर्शनशासनाने गोवारी बांधवाबाबत आजतरी असा दुजाभाव, सावत्रपणा ठेवू नये. गोवारी समाजाला स्वतंत्र इतिहास, संस्कृती आहे. स्मारकाच्या रुपाने येथे गोवारी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे छोटेखानी संग्रहालय साकारावे. येथे गोवारी जीवनदर्शन घडविणारी चित्रमालिका साकारावी, इतिहास मांडणारी आर्ट गॅलरी निर्माण करावी, जेणेकरून गोवारी समाजाचा इतिहास काळाच्या ओघात पुसला जाणार नाही आणि पुन्हा एखादे हत्याकांड घडणार नाही, अशी भावना जीवन आंबुडारे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर