शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आश्रमशाळांतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

By admin | Updated: April 8, 2015 02:35 IST

विदर्भातल्या आश्रम शाळांमधील विद्यार्थिंनीचा लैंगिक छळ, विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकाच खोलीमध्ये ठेवणे, निकृष्ट दर्जाचे भोजन देणे,

नागपूर : विदर्भातल्या आश्रम शाळांमधील विद्यार्थिंनीचा लैंगिक छळ, विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकाच खोलीमध्ये ठेवणे, निकृष्ट दर्जाचे भोजन देणे, विद्यार्थ्यांची संख्या फुगवून दाखविणे इत्यादी गैरप्रकाराची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी योग्य कारवाई करण्यासंदर्भात शासनाला न्यायालयाकडून वेळोवेळी आवश्यक ते निर्देश देण्यात येत आहेत. न्यायालयात हे प्रकरण २००३ पासून प्रलंबित आहे. त्यावेळी आश्रम शाळांतील गैरप्रकार प्रकाशात आल्यानंतर न्यायालयाने आदिवासी मुलामुलींच्या हितासाठी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली होती. विदर्भातील विविध जिल्ह्यांमधल्या आश्रम शाळांची भ्रष्टाचार व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झाली आहे. अनेक आश्रम शाळांमध्ये आजही मुला-मुलींना निर्धारित निकषानुसार भोजन दिले जात नाही. राहण्यासाठी योग्य सुविधा नाही. मुला-मुलींना एकाच खोलीमध्ये ठेवले जाते. यातून लैंगिक छळाच्या घटना घडतात. न्यायालयाने आश्रम शाळांच्या परिस्थितीसंदर्भात दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु, या निर्देशाचे शासनाने पालन केलेले नाही. शासनातर्फे काही दिवसांपूर्वी एक अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती आहे. हा अहवाल अद्याप न्यायालयासमक्ष आलेला नाही. १९ सप्टेंबर २००२ च्या ‘जीआर’ अनुसार आश्रम शाळांतील समस्या सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय व प्रादेशिक समिती स्थापन करण्यात आली आहे. आश्रम शाळांमध्ये आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात प्रादेशिक समितीकडे शिफारस करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची आहे. प्रादेशिक समितीला जिल्हास्तरीय समितीच्या मागण्या पूर्ण करण्याचे अधिकार आहेत. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी (अध्यक्ष), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (उपाध्यक्ष) व इतर सात सदस्यांचा (दोन महिला) तर, प्रादेशिक समितीमध्ये अतिरिक्त आदिवासी आयुक्त (अध्यक्ष), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण अधिकारी, अशासकीय संस्थांशी संबंधित तीन महिला सदस्य व आश्रम शाळांच्या दोन महिला अधीक्षक यांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिवांनी ११ आॅक्टोबर २०१० रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले पण, त्यात कोणतीच ठोस माहिती दिली नाही. यामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. आदिवासी विकास आयुक्तांना लैंगिक छळ व इतर गैरप्रकारासंदर्भात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सचिवांनी सांगितले होते. परंतु, किती एफआयआर नोंदविण्यात आलेत यासंदर्भात त्यांनी काहीच म्हटले नाही. परिणामी न्यायालयाने शासनाकडून ठोस उत्तर मागितले आहे. (प्रतिनिधी)