शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

By सुमेध वाघमार | Updated: August 17, 2023 18:05 IST

४०-६० टक्के रुग्णांचे घटतात प्लेटलेट्स

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढत्या डेंग्यू रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. विशेषत: तीन ते चार दिवसांत डेंग्यूचा ताप कमी होताच रुग्णाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्लेटलेट्स कमी होऊन जीवाचा धोका वाढत आहे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात डेंग्यु, मलेरीयासारख्या आजारांसह जिवाणूजन्य, बुरशीजन्य व व्हायरल संसगार्मुळे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.  डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याने रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे जीवाचा धोकाही संभवतो. अशा वेळी साध्या तापाकडेही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. रिया बालीकर यांचे म्हणणे आहे.

- सातव्या दिवसांपासून प्लेटलेट्स होतात कमी

डेंग्यू झाल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण घटत असले तरी ताप आल्यानंतर तातडीने प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत नाही. साधारणत: सातव्या दिवशीपासून प्लेटलेट्स कमी होतात, असे निरिक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यावेळी ताप कमी झाल्याने रुग्णाचे प्लेटलेट्सच्या संख्येकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकूणच डेंग्यु विकारामध्ये सात ते चौदा दिवस हे फार महत्त्वाचे असतात. चौदाव्या दिवसानंतर पुन्हा प्लेटलेट्सचे प्रमाण वाढू लागते.

- ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच धोकादायक पद्धतीने प्लेटलेट्मध्ये घट

डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होणे ही सामान्य बाब आहे. ४० ते ६० टक्के रुग्णांच्या शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. पण, केवळ ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच प्लेटलेट्स धोकादायक पद्धतीने घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे डेंग्यू होताच फार अधिक चिंता करण्याची गरज नाही. पण, तापाकडे दुर्लक्ष नको, काळजी निश्चितच घ्यावी, डॉक्यरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घ्यावा.

- प्लेटलेट्स २० हजारांच्या खाली आल्यास धोका

 प्लेटलेट्स रक्तातील सर्वात छोट्या पेशी असतात. रक्तातील ‘क्लॉटिंग’ घटकांसह रक्तस्त्राव थांबविणे हे प्लेटलेट्सचे मुख्य कार्य आहे. रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रक्त स्त्राव होण्याचा धोका वाढतो. शरीरात १.५ लाख ते ४.५ लाख प्लेटलेट्स प्रति ‘मायक्रोलिटर’ असतात. मात्र, त्यांची संख्या २० हजारांच्या खालती आली तर धोक्याची पातळी ओलांडल्याचे मानले जाते. अशा वेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देण्याची गरज पडू शकते. याशिवाय  डेंग्यूसोबतच इतरही आजार उद्भवतात. यकृत, फुफ्फूस, मेंदू आणि किडनीवरही परिणाम होतो. ही स्थिती निर्माण झाल्यास रुग्णास भरती करणे गरजेचे असते. मात्र, वेळेत उपचार केले तर गुंतागूंत टाळता येऊ शकते. 

- पपईचा पानाचा रसामुळे प्लेटलेट्स वाढत नाही

डेंग्यु झाल्यानंतर पपईच्या पानांचा रस व पपई देण्यात येते. शिवाय किवीसारखी काही फळ देखील दिल्या जातात. मात्र, त्यामुळे प्लेटलेट्स वाढत असल्याचे आढळून आले नाही. शिवाय याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. उलट कुणाला प्लेटलेट्सची गरज असल्यात ते दान करण्यावर भर द्यावा. 

- डॉ. रिया बालीकर, रक्तविकार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू