शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्दसह विदर्भातील सात प्रकल्प लवकरच : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:46 IST

विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ .......

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सिंचन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ३० हजार कोटी रुपयांच्या योजनेचे हे प्रकल्प असून यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री व अ‍ॅग्रो व्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.गडकरी पुढे म्हणाले, राज्यात फडणवीस सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. यातही जलयुक्त शिवार हे सर्वोत्कृष्ट असे काम आहे. सिंचनाच्या क्षेत्रात सरकार आणखी काम करीत आहे. केवळ विदर्भच नव्हे तर मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ३८५ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा दमणगंगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच आणखीही काही प्रकल्प आहेत. आत्महत्यग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. उघडे कॅनलऐवजी आता पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंचनाचे क्षेत्र २१ टक्के असून २०१९ पर्यंत दुप्पट वाढवून ४२ टक्केपर्यंत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरात मदर डेअरी सुरू केली. सध्या १ लाख ३० हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. ज्या दिवशी २५ लाख लिटर दूध संकलित केले जाईल, त्यादिवशी शेतकºयांना आत्महत्या करावी लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातही ऊस होऊ शकतो, हे आम्ही करून दाखविल्याचेही ते म्हणाले. रोजगारासाठी लोक शहरात येण्याऐवजी शहरातून लोक रोजगारासाठी गावांमध्ये जावे, हे आपले स्वप्न असल्याचेही गडकरी म्हणाले.