शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

गोसेखुर्दसह विदर्भातील सात प्रकल्प लवकरच : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:46 IST

विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ .......

ठळक मुद्दे२०१९ पर्यंत महाराष्ट्रातील सिंचन दुप्पट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाचे नशीब बदलवणारा गोसेखुर्द प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. इतकेच नव्हे तर गोसेखुर्दसह बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव, निम्न वर्धा, बेंबळा आणि निम्न पेढी प्रकल्प हे विदर्भातील सातही प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ३० हजार कोटी रुपयांच्या योजनेचे हे प्रकल्प असून यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास विदर्भातील १० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी आणि जलसंपदा मंत्री व अ‍ॅग्रो व्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केला.गडकरी पुढे म्हणाले, राज्यात फडणवीस सरकारने अतिशय उत्कृष्ट काम केले आहे. यातही जलयुक्त शिवार हे सर्वोत्कृष्ट असे काम आहे. सिंचनाच्या क्षेत्रात सरकार आणखी काम करीत आहे. केवळ विदर्भच नव्हे तर मराठवाडा व संपूर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्रातील ३८५ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. २५ हजार कोटी रुपयांचा दमणगंगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच आणखीही काही प्रकल्प आहेत. आत्महत्यग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांच्या विकासासाठी १० हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. उघडे कॅनलऐवजी आता पाईपद्वारे पाणी पोहोचवण्यास सुरुवात झाली असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातील सिंचनाचे क्षेत्र २१ टक्के असून २०१९ पर्यंत दुप्पट वाढवून ४२ टक्केपर्यंत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नागपुरात मदर डेअरी सुरू केली. सध्या १ लाख ३० हजार लिटर दूध संकलित केले जात आहे. ज्या दिवशी २५ लाख लिटर दूध संकलित केले जाईल, त्यादिवशी शेतकºयांना आत्महत्या करावी लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भातही ऊस होऊ शकतो, हे आम्ही करून दाखविल्याचेही ते म्हणाले. रोजगारासाठी लोक शहरात येण्याऐवजी शहरातून लोक रोजगारासाठी गावांमध्ये जावे, हे आपले स्वप्न असल्याचेही गडकरी म्हणाले.