शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

गोसेखुर्दसह सात सिंचन प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:53 IST

नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे .....

ठळक मुद्देअविनाश सुर्वे : मुख्यमंंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारली आहे ‘वॉर रूम’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर व अमरावती विभागातील मुख्यमंत्री यांच्या वाररूममध्ये प्राधान्यक्रम असलेल्या गोसेखुर्दसह निम्न वर्धा, बेंबळा, खडकपूर्ण, निम्न पेढी, डोंगरगाव, बावनथडी या सात प्रकल्पांची कामे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यानुसार प्रकल्पनिहाय निधीचे नियोजनसुध्दा करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ सिंचन महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली.सिंचन भवन सभागृहात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमात अविनाश सुर्वे बोलत होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, अधीक्षक अभियंता जी.एम. शेख, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.सुर्वे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले असून त्यासाठी वाररूम तयार करून प्रत्येक प्रकल्पांचा आढावा घेऊन प्रकल्पाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे ठरविले आहे. विदर्भातील १९ प्रकल्प या वाररूम मध्ये घेण्यात आले आहेत. त्यामध्ये बावनथडी मोठा प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे.दर्जेदार पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपयेगोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये दर्जेदार पुनर्वसन तसेच नागरी सुविधा, पिण्याच्या पाण्याचा बारमाही पुरवठा, रस्त्यांच्या सुविधा, सांडपाणी व्यवस्था, तसेच शाळांच्या दुरुस्तीसह आदर्श पुनर्वसनासाठी २५० कोटी रुपये मिळाले आहे. आॅगस्ट २०१८ पर्यंत पुनर्वसनाचे काम पूर्ण झाल्यानंतर गोसेखुर्द प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होईल. यामुळे नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकºयांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.केंद्र सरकारच्या एनबीसीसीकडे कामशासनाने केंद्र शासनांतर्गत असलेल्या नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (एनबीसीसी) या संस्थेला गुणवत्ता व अंतर्गत नियोजनानुसार चांगले व दर्जेदार पुनर्वसन करण्यासोबत नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी नियुक्त केले असून सुमारे एक हजार कोटी रुपयाचे काम ही संस्था करणार आहे. यामध्ये २०० कोटी रुपयांचे काम नागरी सुविधांची असून ८०० कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्पांची कामे ही संस्था करणार आहे.बंदिस्त पाईपद्वारे शेतापर्यंत पाणीकालव्याकरिता पाईपद्वारे सिंचन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे जून २०२० पर्यंत १५६,००० हेक्टर सिंचन क्षेत्रास लाभ पोहोचविण्याचे नियोजन आहे. यासोबतच बंदिस्त पाईपद्वारेच बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पावरील १२ उपसा सिंचन योजनांवर अंमबजावणी करून १ लाख हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ मिळेल. निम्न वर्धा अंतर्गत आर्वी तसेच गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत ५ उपसा सिंचन योजना करण्याचे नियोजन असल्याचेही अविनाश सुर्वे यांनी सांगितले. यात पाईपद्वारे थेट शेतापर्यंत पाणी पोहोचवता येणार आहे.