शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

भरधाव ट्रकने सात गाई चिरडल्या

By admin | Updated: October 30, 2016 02:48 IST

अनियंत्रित ट्रक रोडच्या कडेने जात असलेल्या गाईच्या कळपात शिरला. त्यात सात गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गाई गंभीर जखमी झाल्या.

१० गाई जखमी : बेसूर-केसलापूर मार्गावरील घटनानांद : अनियंत्रित ट्रक रोडच्या कडेने जात असलेल्या गाईच्या कळपात शिरला. त्यात सात गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गाई गंभीर जखमी झाल्या. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसूर-केसलापूर मार्गावरील नागोबा मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना नरकचतुर्दशच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विकास किसना नेव्हारे (३०, रा. बेसूर, ता. भिवापूर) नामक गुराखी बेसूर (ता. भिवापूर) येथील अंदाजे १५० गाई मुचेपार परिसरातील जंगलात नेहमीप्रमाणे चारावयास घेऊन जात होता. या गार्इंचा कळप रोज बेसूर-नाळपाटीमार्गे मुचेपारच्या जंगलात जातो. हा कळप नाळपाटीनजीकच्या नागोबा मंदिराच्या वळणावर पोहोचताच उमरेडहून हिंगणघाटकडे (जिल्हा) भरधाव जाणाऱ्या एमएच-३१/सीबी-००५६ क्रमांकाच्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने गार्इंच्या कळपात शिरला. त्यामुळे काही गाई ट्रकच्या चाकाखाली आल्या तर काही रोडच्या कडेला फेकल्या गेल्या. यात ७ गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गार्इंना गंभीर दुखापत झाली. ठार झालेल्या गाई बेसूर येथील मनोहर धोटे, शैलेश अगवान, संजय उईके, युवराज अगवान, सुधाकर भुळे, मयूर मेंडूले यांच्या मालकीच्या असून, रामकृष्ण दाहाघाने, पत्रू धोटे, गंगाधर नारनवरे, रामभाऊ शिंगाडे, मयूर मेंडूले, सखाराम चाचेरकर, प्रभाकर दाभेकर, सचिन अंड्रसकर, अशोक सेलोटे यांच्या गाई जखमी झाल्या. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. या रोडवरून जणाऱ्या काहींनी सदर अपघाताची माहिती बेसूर येथील नागरिक तसेच उमरेड पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. (वार्ताहर)उताराचा मार्गउमरेड हिंगणघाट मार्गावरील नाळपाटी वळणापासून (बेसूरच्या दिशेने) हा मार्ग उताराचा आहे. बहुतांश वाहनचालक त्यांची वाहने इंधन वाचविण्यासाठी या वाहनावर ‘न्यूट्रल’ करतात. ही वाहने न्यूट्रलमध्ये बेसूरपर्यंत नेली जातात. शिवाय, या वळण मार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडे -झुडपे असल्याने समोरून येणारे वाहन सहसा वाहनचालकांना दिसत नाही. गुराखी गाई घेऊन जंगलाकडे जात असताना याच वळणावर हा अपघात झाला. सणाला गालबोटग्रामीण भागात दिवाळीच्या दिवशी (लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा) गार्इंची पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर, बलिप्रतिपदेच्या दिवशी गार्इंना आकर्षक सजवून त्यांची गावातून वाजत - गाजत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली जाते. त्यातच या अपघातात बेसूर येथील सहा गाई ठार झाल्याने दिवाळीच्या उत्सवाला गालबोट लागले. हा ट्रक गिट्टी घेऊन जात होता. ट्रक कळपात शिरताच गुराखी जीव वाचविण्यासाठी शेजारच्या शेतात पळाला.