शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भरधाव ट्रकने सात गाई चिरडल्या

By admin | Updated: October 30, 2016 02:48 IST

अनियंत्रित ट्रक रोडच्या कडेने जात असलेल्या गाईच्या कळपात शिरला. त्यात सात गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गाई गंभीर जखमी झाल्या.

१० गाई जखमी : बेसूर-केसलापूर मार्गावरील घटनानांद : अनियंत्रित ट्रक रोडच्या कडेने जात असलेल्या गाईच्या कळपात शिरला. त्यात सात गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गाई गंभीर जखमी झाल्या. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसूर-केसलापूर मार्गावरील नागोबा मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना नरकचतुर्दशच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विकास किसना नेव्हारे (३०, रा. बेसूर, ता. भिवापूर) नामक गुराखी बेसूर (ता. भिवापूर) येथील अंदाजे १५० गाई मुचेपार परिसरातील जंगलात नेहमीप्रमाणे चारावयास घेऊन जात होता. या गार्इंचा कळप रोज बेसूर-नाळपाटीमार्गे मुचेपारच्या जंगलात जातो. हा कळप नाळपाटीनजीकच्या नागोबा मंदिराच्या वळणावर पोहोचताच उमरेडहून हिंगणघाटकडे (जिल्हा) भरधाव जाणाऱ्या एमएच-३१/सीबी-००५६ क्रमांकाच्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने गार्इंच्या कळपात शिरला. त्यामुळे काही गाई ट्रकच्या चाकाखाली आल्या तर काही रोडच्या कडेला फेकल्या गेल्या. यात ७ गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गार्इंना गंभीर दुखापत झाली. ठार झालेल्या गाई बेसूर येथील मनोहर धोटे, शैलेश अगवान, संजय उईके, युवराज अगवान, सुधाकर भुळे, मयूर मेंडूले यांच्या मालकीच्या असून, रामकृष्ण दाहाघाने, पत्रू धोटे, गंगाधर नारनवरे, रामभाऊ शिंगाडे, मयूर मेंडूले, सखाराम चाचेरकर, प्रभाकर दाभेकर, सचिन अंड्रसकर, अशोक सेलोटे यांच्या गाई जखमी झाल्या. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. या रोडवरून जणाऱ्या काहींनी सदर अपघाताची माहिती बेसूर येथील नागरिक तसेच उमरेड पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. (वार्ताहर)उताराचा मार्गउमरेड हिंगणघाट मार्गावरील नाळपाटी वळणापासून (बेसूरच्या दिशेने) हा मार्ग उताराचा आहे. बहुतांश वाहनचालक त्यांची वाहने इंधन वाचविण्यासाठी या वाहनावर ‘न्यूट्रल’ करतात. ही वाहने न्यूट्रलमध्ये बेसूरपर्यंत नेली जातात. शिवाय, या वळण मार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडे -झुडपे असल्याने समोरून येणारे वाहन सहसा वाहनचालकांना दिसत नाही. गुराखी गाई घेऊन जंगलाकडे जात असताना याच वळणावर हा अपघात झाला. सणाला गालबोटग्रामीण भागात दिवाळीच्या दिवशी (लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा) गार्इंची पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर, बलिप्रतिपदेच्या दिवशी गार्इंना आकर्षक सजवून त्यांची गावातून वाजत - गाजत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली जाते. त्यातच या अपघातात बेसूर येथील सहा गाई ठार झाल्याने दिवाळीच्या उत्सवाला गालबोट लागले. हा ट्रक गिट्टी घेऊन जात होता. ट्रक कळपात शिरताच गुराखी जीव वाचविण्यासाठी शेजारच्या शेतात पळाला.