शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सेतू हाऊसफुल्ल

By admin | Updated: June 16, 2017 02:00 IST

दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच विविध प्रमाणपत्र बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील

विविध प्रमाणपत्रांसाठी लागताहेत रांगा : निकालानंतर गर्दी आवरेना लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावी, बारावीचे निकाल जाहीर होताच विविध प्रमाणपत्र बनवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतूमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून सेतू कार्यालय गर्दीने हाऊसफुल्ल होत आहे. कार्यालयाबाहेरपर्यंत रांगाच रांगा लागत आहेत. ही गर्दी आणखी काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचे सांगितले जाते. दहावी-बारावीचा निकाल लागल्यावर पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, राष्ट्रीयता, डोमीसाईल, उत्पन्न आदी प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे परीक्षांचे निकाल जाहीर होताच सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी होत असते. हा दरवर्षीचाच अनुभव आहे. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनुसार सामान्यपणे दर दिवशी विविध प्रमाणपत्रासाठी जवळपास हजार अर्ज येतात. परंतु सध्या याची सख्या दीड ते पावणे दोन हजारापर्यंत पोहोचली आहे.अतिरिक्त शुल्क आकारल्यास महा ई-सेवा केंद्राविरुद्ध कारवाई प्रमाणपत्रासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन महा ई-सेवा केंद्राद्वारे याचा फायदा घेत अतिरिक्त शुल्क आकारल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी गांभीर्याने घेतली असून नियोजित शुल्कच आकारण्यात यावे, कुणी अतिरिक्त शुल्क आकारत असतील तर त्याची तक्रार करावी, कुणी यात दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. विशेष शिबिरानंतरही गर्दी कायम दहावी-बारावीनंतर सेतू कार्यालयात होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत शाळांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले होते. दोन टप्प्यांमध्ये हे शिबिर घेण्यात आले होते. त्या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. यासोबत प्रत्येक तालुक्यातही विशेष शिबिर घेण्यात आले.