शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

प्रलंबित तक्रारींचा निपटारा करा

By admin | Updated: April 4, 2017 02:04 IST

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे.

लोकशाहीदिनात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे आवाहननागपूर : जिल्हास्तरीय लोकशाही दिनात जनतेकडून दाखल होणाऱ्या तक्रारींसंदर्भात एक महिन्यात निर्णय घेऊन केलेल्या कार्यवाहीबाबत तक्रारदारांना कळविणे बंधनकारक आहे. विविध विभागप्रमुखांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारींवर तत्काळ निर्णय घेऊन तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल अवगत करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिल्या.जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन छत्रपती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी व तक्रारी लोकशाही दिनात मांडली. निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी तक्रारी सोपविल्या. या लोकशाही दिनात २० तक्रारी दाखल झाल्या आहेत. भूमिअभिलेख, महसूल तसेच सहकारी विभागासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आजच्या लोकशाही दिनात दाखल झाल्या. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)विविध विभागात १८४ तक्रारी प्रलंबितविविध विभागांमध्ये १८४ तक्रारी प्रलंबित आहेत. यापैकी सार्वाधिक तक्रारी भूमिअभिलेख तसेच महसूल, शिक्षण, नगर प्रशासन, सहकार, नागपूर पाटबंधारे विभाग आदी विभागांशी संबंधित आहेत. या तक्रारीं संदर्भात चौकशी करून संबंधित तक्रारदाराला केलेल्या कार्यवाहीबद्दल लेखी स्वरूपात कळविण्यात यावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.विभागीय लोकशाहीदिन १० एप्रिल रोजी विभागीय लोकशाहीदिन येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार हे जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी ऐकतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, लोकशाही दिनाच्या टोकनाची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच घेऊन सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वत: उपस्थित राहावे.