शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

प्रत्येक जिल्ह्यात महिनाभरात ऑक्सिजन प्रकल्प उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या स्थितीवर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या स्थितीवर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भातील सर्व पालकमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना आजची स्थिती आणि भविष्यातील उपाययोजना यावर यात चर्चा करण्यात आली. ऑक्सिजन प्रकल्प महिनाभरात सुरू झाले पाहिजेत. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समिती, जिल्हा खनिज निधी व सामाजिक दायित्व निधीतून उभारावा. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता तातडीने निविदा प्रक्रिया पार पाडावी, असे स्पष्ट आदेश या बैठकीत देण्यात आले.

बैठकीला गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ,चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, गोंदियाचे पालकमंत्री नवाब मालिक, भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम, अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, वाशीमचे पालकमंत्री शंभुराज देसाई, यवतमाळचे पालकमंत्री सांदीपन भुमरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढील काळामध्ये भिलाई प्लान्टमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा यावर मर्यादा येऊ शकतात. याशिवाय देशभरातून या प्लान्टमधून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी आहे. त्यामुळे आतापर्यंत नियमित मिळणाऱ्या पुरवठ्यावरदेखील निर्बंध लागू शकतात. यासाठी पुढील काळामध्ये आपल्यास्तरावर ऑक्सिजनची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्याने करणे गरजेचे आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची तांत्रिक मदत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत केली जाणार आहे. यासाठी तांत्रिक सहकार्य, यंत्रसामग्री व आवश्यक मनुष्यबळ प्रसंगी विदेशातून उपलब्ध करण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या पुरवठ्यावर राऊत नियंत्रण ठेवणार

विदर्भातील प्रत्येक जिल्ह्याला लागणारा महिनाभराचा ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हेंटिलेटर तातडीने पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. या सर्व पुरवठ्यावर नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे नियंत्रण ठेवतील, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

वर्धा, अमरावतीत तातडीने पावले उचला

विशेषतः वर्धा, अमरावती या ठिकाणी तातडीने प्लान्ट उभारणे गरजेचे असून यासाठी अतिशय गतिशील व्हावे लागणार आहे. दुसऱ्या लाटेचे परिणाम गंभीर असताना आणखी संकट गडद झाल्यास गडचिरोलीसह विदर्भातील दुर्गम भागात तसेच सर्वच जिल्ह्यातसुद्धा आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे, असा बैठकीतील सूर होता. पीएसए प्लान्टची मागणी तात्काळ नोंदविली पाहिजे. यासाठीची प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या शासकीय नियमात अडकू नये, असे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.