शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.

ठळक मुद्देदेशाच्या कानाकोपऱ्यातून येतात सैनिक : सलग चार दिवस अनुयायांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.१९२७ च्या त्या काळात समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होती. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, हे स्वाभिमानाचे नवे वारे होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावागावात अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा, १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येक वेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी हे सैनिक तेवढ्याच प्रेरणेने झटतात. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाऱ्या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून अडीच हजार सैनिक येणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथूनही सैनिक येतात.सुरक्षेसोबतच सहकार्यहीसमता सैनिक दलाचे अतिरिक्त महासचिव पृथ्वी मोटघरे यांनी सांगितले, १६ ते १९ आॅक्टोबर असे सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमीच्या परिसरात अनुयायांना सेवा दिली जाणार आहे. यात दीक्षाभूमीच्या सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजाऱ्यांना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामाची जबाबदारी सैनिकांवर असेल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर