शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.

ठळक मुद्देदेशाच्या कानाकोपऱ्यातून येतात सैनिक : सलग चार दिवस अनुयायांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.१९२७ च्या त्या काळात समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होती. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, हे स्वाभिमानाचे नवे वारे होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावागावात अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा, १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येक वेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी हे सैनिक तेवढ्याच प्रेरणेने झटतात. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाऱ्या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून अडीच हजार सैनिक येणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथूनही सैनिक येतात.सुरक्षेसोबतच सहकार्यहीसमता सैनिक दलाचे अतिरिक्त महासचिव पृथ्वी मोटघरे यांनी सांगितले, १६ ते १९ आॅक्टोबर असे सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमीच्या परिसरात अनुयायांना सेवा दिली जाणार आहे. यात दीक्षाभूमीच्या सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजाऱ्यांना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामाची जबाबदारी सैनिकांवर असेल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर