शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:30 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.

ठळक मुद्देदेशाच्या कानाकोपऱ्यातून येतात सैनिक : सलग चार दिवस अनुयायांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी येतात. हातात निळे झेंडे आणि मुखातून होणाऱ्या बाबासाहेबांच्या गजराने एक उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो अनुयायी एकाच ठिकाणी येत असल्याने कुठलीही विपरीत घटना घडू नये, प्रत्येक जण सुरक्षित असावा, यासाठी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस दीक्षाभूमीवर समता सैनिक दलाचे सैनिक तैनात असतात. निळी टोपी, पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट आणि हातात काठी हा गणवेशधारी सैनिक दीक्षाभूमी परिसरात प्रत्येक ठिकाणी आपली जबाबदारी सांभाळत असतो. यावर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातील अडीच ते तीन हजार सैनिक दीक्षाभूमीवर आपली सेवा व सुरक्षा पुरविणार आहेत.१९२७ च्या त्या काळात समाजात अस्पृश्यावर अन्याय, अत्याचार होतच होते. सगळा समाज विषमतेत जळत होता. बाबासाहेबांच्या चळवळीमुळे समाजात जागृती होत होती. शेकडो वर्षे मान खाली घालून चालणारे लोक मान वर करू लागले होते. माणसे मुक्तीच्या वाटा चालू लागली होती. सवर्णांना हे आवडणे शक्य नव्हते, हे स्वाभिमानाचे नवे वारे होते आणि त्याचा परिणाम म्हणून गावागावात अस्पृश्यावर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले. अशावेळी गावागावातील लोकांच्या रक्षणासाठी, चळवळीची ताकद वाढविण्यासाठी आणि महाडच्या सत्याग्रहाच्या यशस्वितेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा, १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येक वेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. आजही दीक्षाभूमीच्या व्यवस्थेसाठी हे सैनिक तेवढ्याच प्रेरणेने झटतात. समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाऱ्या ६२ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून अडीच हजार सैनिक येणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथूनही सैनिक येतात.सुरक्षेसोबतच सहकार्यहीसमता सैनिक दलाचे अतिरिक्त महासचिव पृथ्वी मोटघरे यांनी सांगितले, १६ ते १९ आॅक्टोबर असे सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक दीक्षाभूमीच्या परिसरात अनुयायांना सेवा दिली जाणार आहे. यात दीक्षाभूमीच्या सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजाऱ्यांना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामाची जबाबदारी सैनिकांवर असेल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर