शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घरातूनच वेगळा करा ओला आणि सुका कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:32 IST

२० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.

ठळक मुद्देनागपूर मनपा आयुक्त अभिजित बांगर यांचे आवाहन : दररोज आढावा घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनीचे कंत्राट संपुष्टात आले आहे.महापालिकेने नवीन दोन कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. या कंपन्यांनी शनिवारपासून कचरा संकलनाच्या कामाला सुरूवात केली आहे. नागरिकांच्या घरातील कचरा वर्गीकृत करूनच घेणार आहे. सुरुवातीला याबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येणार आहे. २० नोव्हेंबरनंतर नागरिकांनी स्वत:हून ओला आणि सुका कचरा विलग करुनच संबंधित स्वच्छतादूताकडे द्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्तअभिजित बांगर यांनी केले. तसेच त्यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.महापालिका मुख्यालयातील सभागृहात शनिवारी नवीन कंपन्यांच्या कामासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत आयुक्त बोलत होते. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.आयुक्त म्हणाले, यंत्रणा ही नवीन असल्याने सुरुवातीला काम करायला थोडा त्रास जाईल. काही सजग नागरिक कचरा विलग करून देतील. परंतु सर्वच नागरिक कचरा विलग करून देणार नाहीत. याबाबत यंत्रणेमार्फत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. २० तारखेपर्यंत नागरिकांना याबाबत अवगत करावे. २० तारखेनंतर कुठल्याही घरातून कचरा एकत्रित घेऊ नका, असे निर्देश आयुक्तांनी कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेला दिले आहेत. जोपर्यंत यंत्रणा सुरळीत कार्य करीत नाही, तोपर्यंत दररोज आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रारंभी यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये त्यांना काही त्रुटी आढळून आल्याचे दिसून आले. त्या तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी यंत्रणेला दिले.वीरेंद्र कुकरेजा यांनी यावेळी नवीन यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती सांगितली. आतापर्यंत शहरात १७० कचरा संकलन केंद्र होते. आता नवीन यंत्रणेच्या कार्यपद्धतीनुसार फक्त २५ ट्रांन्सफर युनिट असणार आहेत. यामध्ये गाडीतून कचरा मोठ्या गाडीत टाकल्या जाणार आहे. तेथूनच तो कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठविला जाणार आहे. कचऱ्याचा पुरेपूर उपयोग करून त्यावर प्रक्रिया करणार असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.जुन्या कर्मचाऱ्यांना समावून घेणारयावेळी जुन्या कचरा संकलन यंत्रणा कनक रिसोर्सेच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडला. यावर बोलताना आयुक्त यांनी कनकच्या सर्व कर्मचाऱ्यांना नवीन यंत्रणेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी अट निविदेमध्ये समाविष्ट केली असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.कचरा वर्गीकृत करूनच द्याआपले शहर स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी महानगरपालिका प्रयत्नरत आहे. नागरिकांनी मनपाच्या प्रयत्नांना सहकार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या घरातील कचरा हा ओला सुका वर्गीकृत करून द्यावा, असे आवाहन अभिजित बांगर यांनी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाAbhijit Bangarअभिजित बांगरcommissionerआयुक्तGarbage Disposal Issueकचरा प्रश्न