शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

हत्येच्या आरोपीची चौकशी न करताच कारागृहात पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:37 IST

विकृती जडलेला खतरनाक गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाची हत्या करतो. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एका पोलीस ठाण्यात एक रात्र आणि अर्धा दिवस मुक्कामी असतो.

ठळक मुद्देहायटेकच्या नादात बेसिक पुलिसिंगचा विसर : धक्कादायक वास्तव उघड

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकृती जडलेला खतरनाक गुन्हेगार एका अल्पवयीन मुलाची हत्या करतो. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर दुसºया दिवशी तो एका पोलीस ठाण्यात एक रात्र आणि अर्धा दिवस मुक्कामी असतो. पोलीस त्याला रात्री अन् सकाळचे जेवण पुरवितात. सकाळ-दुपारचा चहा-नाश्ताही करवितात. तो हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असूनही त्याने फरारीच्या काळात किती आणि कुठे गुन्हे केले, त्याची चौकशी करण्याचे कष्ट पोलीस घेत नाहीत. होय, पोलिसांच्याच अहवालानुसार चार जणांची हत्या करणारा आणि अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी, अट्टल गुन्हेगार छल्ला ऊर्फ दुर्गेश ध्रुपसिंग चौधरी हा अरमान नामक मुलाची हत्या केल्यानंतर काही तासातच कळमना पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र, पोलिसांनी त्याला बोलते करण्याऐवजी त्याच्या आदरातिथ्यावरच भर दिला अन् एमसीआरच्या नावाखाली कारागृहात पोहोचविले. ही धक्कादायक माहिती उघड झाल्यानंतर स्मार्ट आणि हायटेक पुलिसिंगचा दावा करणाºया नागपूर पोलिसांना बेसिंग पुलिसिंगचा विसर पडल्याचेही स्पष्ट झाले आहे. या घटनाक्रमामुळे सर्वसामान्यांसोबतच पोलीस दलातही चर्चेला उधाण आले आहे.कोणत्याही गुन्हेगाराची माहिती एका क्लिकवर उपलब्ध असल्याचा दावा अलीकडे पोलीस करतात. गुन्हा घडल्यानंतर काही तासातच गुन्हेगाराची माहिती मिळू शकते, असे तंत्रज्ञान पोलिसांकडे उपलब्ध आहे. गुन्हेगाराला हुडकून काढण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅबही नागपुरात आहे. सीसीटीएनएसही आहे. मात्र, या सर्व सुविधा असूनही त्याचा वापर करण्याचे कौशल्य किती पोलीस अधिकारी-कर्मचाºयांच्या अंगी आहे, असा प्रश्न या प्रकरणाने उपस्थित झाला आहे. एक अट्टल गुन्हेगार १८ ते २० तास पोलिसांच्या ताब्यात असूनही त्याची झाडाझडती पोलिसांनी का घेतली नाही, हा प्रश्न गंभीरच नाही तर संशय वाढविणाराही आहे. कारण एप्रिलच्या दुसºया आठवड्यात रनाळा शिवारात छल्लाने कैलास नागपुरेची हत्या केली. त्यानंतर त्याने रेल्वेलाईनवर जाऊन नागपुरेचा मृत्यू रेल्वेच्या धडकेने झाल्याचा बनाव निर्माण केला. कामठी पोलिसांनी छल्लाच्या कटकारस्थानाचा छडा लावला नाही अन् नागपुरेच्या हत्येचे प्रकरण दबले. त्याचमुळे दुसºया आठवड्यात विकृत छल्लाने आरिफ अन्सारी नामक तरुणाचीहायटेक नेभळटपणापूर्वी खतरनाक गुन्हेगार हाती लागताच पोलीस त्याची वेगवेगळ्या पद्धतीने ठोकून बजावून चौकशी करीत होते. त्याने फरारीच्या काळात कुठे कुठे काय काय केले. ते वदवून घेतले जायचे. त्यावेळी पोलिसांकडे साधनसुविधाही तोकड्याच होत्या. आता स्मार्ट पुलिसिंगच्या नावाखाली हायटेक सुविधा मिळूनही पोलिसांना खतरनाक गुन्हेगारांना बोलते करण्याची सवड नसते. कळमना ठाण्यात आरिफ अन्सारीच्या हत्येचा गुन्हा दाखल होता. छल्ला क्रूर आणि अट्टल गुन्हेगार आहे, हे माहीत असूनही कळमना पोलिसांनी त्याची खातीरदारी करण्याऐवजी त्याला बोलते केले असते तर तीन आठवडेपर्यंत लकडगंज पोलिसांना आणि अरमान तसेच आरिफच्या नातेवाईकांना मनस्ताप भोगावा लागला नसता. स्मार्ट पुलिसिंगच्या मागे धावणाºया नागपूर पोलिसांचा हा हायटेक नेभळटपणा म्हणायचा की काय, असा सवाल चर्चेला आला आहे.