शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

शाळकरी मुलांच्या कथित अपहरणामुळे खळबळ

By admin | Updated: February 4, 2017 03:00 IST

दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या वृत्ताने गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री प्रचंड खळबळ उडवून दिली.

खेळले खेळले अन् उद्यानातच झोपले : सकाळी पुन्हा शाळेत परतले नागपूर : दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या वृत्ताने गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री प्रचंड खळबळ उडवून दिली. पोलीस या मुलांची शोधाशोध करीत असताना ही दोन्ही बालके शुक्रवारी सकाळी शाळेत पोहचली. त्यांनी बेपत्ता होण्यामागचे कारणही सांगितले. ते ऐकून त्यांची आई, शाळा प्रशासन आणि पोलीस अशा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. चित्रांश (वय १२) आणि रिषभ (वय ८) हे दोन सख्खे भाऊ गिट्टीखदानमधील एका शाळेत शिकतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शाळेत गेले. परंतु सायंकाळी घरी परतच आले नाही. त्यांची आई माधवी (काल्पनिक नाव) रात्री घरी पोहचली तेव्हा तिला मुले शाळेतून परतली नसल्याचे कळले. तिने प्रारंभी मुलांच्या मित्रांकडे विचारपूस केली. नंतर सरळ गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार आल्याने गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी तातडीनेआपल्या सहकाऱ्यांना मुलांचा शोध घेण्यासाठी कामी लावले. रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर वेगवेगळी पोलीस पथके मुलांचा शोध घेऊ लागली. मुलांच्या आईवडीलांचे आपसात पटत नसल्यामुळे मुलांना घेऊन चार वर्षांपासून माधवी आपल्या माहेरी (गिट्टीखदानमध्ये) राहते तर, वडील शिवनी (मध्यप्रदेश) येथे राहतात. यापूर्वी एकदा वडिलांनी त्यांना सोबत नेले होते, अशी माहिती पुढे येताच ठाणेदार निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच मुलांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्याने मुलाला सोबत नेल्याचा इन्कार केला. तो खोटा बोलत असावा, असा संशय घेत पोलिसांचे एक पथक शिवनीकडे रवाना करण्यात आले. रात्रभर शोधाशोध करूनही मुले हाती लागली नाही. त्यामुळे साऱ्यांचीच धाकधूक वाढली. पोलिसांचे एक पथक सकाळीच मुलांच्या शाळेत पोहचले. तेथे त्यांच्या वर्गमित्रांना विचारपूस सुरू असताना एका विद्यार्थ्याने हे दोघे भाऊ मानव सेवा नगरातील उद्यानात रात्री खेळत होते, अशी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचे दुसरे एक पथक उद्यानाकडे रवाना झाले. त्याचवेळी दोघेही भाऊ शाळेत आले. रात्री उद्यानात मनसोक्त खेळल्यामुळे ते थकले आणि तेथेच एका कोपऱ्यात झोपी गेले. सकाळी उशिरा उठल्याने तशाच अवस्थेत ते शाळेत पोहचले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.ते ऐकून त्यांच्या नातेवाईकांचाच नव्हे तर शाळा प्रशासन आणि पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.(प्रतिनिधी) आईच्या भावना अनावर अपहरणाच्या संशयामुळे मुलांची आई पुरती हादरली होती. तब्बल २४ तासानंतर मुलांना सुखरूप पाहून तिच्या भावना अनावर झाल्या. तिने दोघांनाही कवटाळून घेतले. कथित अपहरणाचा असा सुखद शेवट झाल्याने उपस्थितांसह पोलिसांनाही दिलासा मिळाला.