शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांच्या कथित अपहरणामुळे खळबळ

By admin | Updated: February 4, 2017 03:00 IST

दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या वृत्ताने गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री प्रचंड खळबळ उडवून दिली.

खेळले खेळले अन् उद्यानातच झोपले : सकाळी पुन्हा शाळेत परतले नागपूर : दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाच्या वृत्ताने गिट्टीखदान परिसरात गुरुवारी रात्री प्रचंड खळबळ उडवून दिली. पोलीस या मुलांची शोधाशोध करीत असताना ही दोन्ही बालके शुक्रवारी सकाळी शाळेत पोहचली. त्यांनी बेपत्ता होण्यामागचे कारणही सांगितले. ते ऐकून त्यांची आई, शाळा प्रशासन आणि पोलीस अशा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. चित्रांश (वय १२) आणि रिषभ (वय ८) हे दोन सख्खे भाऊ गिट्टीखदानमधील एका शाळेत शिकतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते शाळेत गेले. परंतु सायंकाळी घरी परतच आले नाही. त्यांची आई माधवी (काल्पनिक नाव) रात्री घरी पोहचली तेव्हा तिला मुले शाळेतून परतली नसल्याचे कळले. तिने प्रारंभी मुलांच्या मित्रांकडे विचारपूस केली. नंतर सरळ गिट्टीखदान ठाण्यात धाव घेतली. शाळकरी मुलांचे अपहरण झाल्याची तक्रार आल्याने गिट्टीखदानचे ठाणेदार राजेंद्र निकम यांनी तातडीनेआपल्या सहकाऱ्यांना मुलांचा शोध घेण्यासाठी कामी लावले. रेल्वेस्थानक, बसस्थानकांवर वेगवेगळी पोलीस पथके मुलांचा शोध घेऊ लागली. मुलांच्या आईवडीलांचे आपसात पटत नसल्यामुळे मुलांना घेऊन चार वर्षांपासून माधवी आपल्या माहेरी (गिट्टीखदानमध्ये) राहते तर, वडील शिवनी (मध्यप्रदेश) येथे राहतात. यापूर्वी एकदा वडिलांनी त्यांना सोबत नेले होते, अशी माहिती पुढे येताच ठाणेदार निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच मुलांच्या वडिलांशी संपर्क साधला. त्याने मुलाला सोबत नेल्याचा इन्कार केला. तो खोटा बोलत असावा, असा संशय घेत पोलिसांचे एक पथक शिवनीकडे रवाना करण्यात आले. रात्रभर शोधाशोध करूनही मुले हाती लागली नाही. त्यामुळे साऱ्यांचीच धाकधूक वाढली. पोलिसांचे एक पथक सकाळीच मुलांच्या शाळेत पोहचले. तेथे त्यांच्या वर्गमित्रांना विचारपूस सुरू असताना एका विद्यार्थ्याने हे दोघे भाऊ मानव सेवा नगरातील उद्यानात रात्री खेळत होते, अशी माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचे दुसरे एक पथक उद्यानाकडे रवाना झाले. त्याचवेळी दोघेही भाऊ शाळेत आले. रात्री उद्यानात मनसोक्त खेळल्यामुळे ते थकले आणि तेथेच एका कोपऱ्यात झोपी गेले. सकाळी उशिरा उठल्याने तशाच अवस्थेत ते शाळेत पोहचले, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.ते ऐकून त्यांच्या नातेवाईकांचाच नव्हे तर शाळा प्रशासन आणि पोलिसांचाही जीव भांड्यात पडला.(प्रतिनिधी) आईच्या भावना अनावर अपहरणाच्या संशयामुळे मुलांची आई पुरती हादरली होती. तब्बल २४ तासानंतर मुलांना सुखरूप पाहून तिच्या भावना अनावर झाल्या. तिने दोघांनाही कवटाळून घेतले. कथित अपहरणाचा असा सुखद शेवट झाल्याने उपस्थितांसह पोलिसांनाही दिलासा मिळाला.