शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ज्येष्ठ नागरिक दिन; आयुष्याची सायंकाळ सोनेरी हवी...पण संघर्ष कुठे संपतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 07:00 IST

Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे.

ठळक मुद्दे २०२० मध्ये भराेसा सेलकडे ज्येष्ठांच्या हेल्पलाईन क्रमांकावर ८१ तर ४६ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. २०२१ मध्ये आतापर्यंत फाेनद्वारे ९८ तर ६५ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये मुले, सुना, जावयाकडून त्रास हाेणे, घरामधून काढण्याचा प्रकार, शिवीगाळ करणे, शेज

 

निशांत वानखेडे

नागपूर : आयुष्यभर मुलांच्या संगाेपनात, त्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य खर्ची घातल्यानंतर सोनेरी दिवस येतील आणि रोजची सायंकाळही आनंदाची असेल, अशी अपेक्षा ज्येष्ठांची असते. मात्र, मुले दूर गेल्याने मावळतीलाही त्यांना संघर्ष करावा लागताेय. उपराजधानीत अशा ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. (Senior Citizens Day)

काेराेना महामारीच्या काळात या ज्येष्ठांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे अशा नागरिकांची अडचण प्रकर्षाने समाेर आली. ज्येष्ठांची अनेक जाेडपी आहेत, ज्यांची मुले विदेशात सेटल झाली आहेत. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ही समस्या वाढली आहे. शिवाय काही असेही आहेत, ज्यांनी आई-वडिलांना वाऱ्यावर साेडून वेगळा संसार थाटला आहे. पडत्या काळात आधार देणारे कुणीच नसल्याने लहान-लहान गाेष्टींसाठीही ज्येष्ठांना संघर्ष करावा लागताे. काहींची अवस्था तर दयनीय झाली आहे. अनेकांना चालणेही मुश्किल आहे. त्यांना दुधापासून किराणा ते रुग्णालयात जाण्यापासून औषध आणण्यासाठी कुणीतरी आधार देईल, याची प्रतीक्षा असते. पैसे संपले की बॅंकेत जाणेही मुश्किल असते आणि पैसे काढण्यासाठी कुणावर विश्वासही ठेवता येत नाही, अशी त्यांची द्विधा अवस्था झाली आहे. काेराेना काळात काही सामाजिक संस्थांनी मदत केली पण पुढे काय, हा प्रश्न आहे.

पाेलिसांचा ‘भराेसा’, ५८७६ ज्येष्ठांची नाेंद

अशा ज्येष्ठांच्या सेवेसाठी पाेलीस विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाेलिसांच्या ‘भराेसा सेल’ने त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सेलची विशेष विंग कार्यान्वित करण्यात आली. याआधारे शहरातील ५,८७६ ज्येष्ठांची नाेंद आतापर्यंत करण्यात आली. त्यात २३१ जाेडपी किंवा एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांचा समावेश आहे. केवळ तक्रार निवारणच नाही तर त्यांना औषधे, किराणा, दवाखान्यात नेण्यापासून ते जेवणाचा डबा लावून देण्यापर्यंतचे काम भराेसा सेलच्या टीमने केले आहे.

ज्येष्ठांविरूद्धच्या गुन्ह्यातही वाढ

देशात ज्येष्ठ नागरिकांविरूद्ध हाेणाऱ्या गुन्ह्यामध्ये सातत्य आहे. २०१८ मध्ये २४३४९, २०१९ मध्ये २७८०४ तर २०२० मध्ये २४७९४ गुन्हे घडले. महाराष्ट्रात या काळात अनुक्रमे ५९६१, ६१६३ व ४९०९ गुन्हे घडले. यामध्ये जखमी करण्याच्या १५३९, हल्ल्याच्या ४५, चाेरीच्या १०७०, लुटपाटीच्या २३८, खंडणी मागण्याच्या १८, ज्येष्ठांच्या संपत्तीवर अतिक्रमण करण्याच्या १०६, फसवणुकीच्या ८६६ घटनांचा समावेश आहे. या काळातील ६४४९ गुन्हे प्रलंबित असून ५५.८ टक्केवारी आहे.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक