शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

ज्येष्ठ नागरिक दिन; आयुष्याची सायंकाळ सोनेरी हवी...पण संघर्ष कुठे संपतोय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 07:00 IST

Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे.

ठळक मुद्दे २०२० मध्ये भराेसा सेलकडे ज्येष्ठांच्या हेल्पलाईन क्रमांकावर ८१ तर ४६ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. २०२१ मध्ये आतापर्यंत फाेनद्वारे ९८ तर ६५ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये मुले, सुना, जावयाकडून त्रास हाेणे, घरामधून काढण्याचा प्रकार, शिवीगाळ करणे, शेज

 

निशांत वानखेडे

नागपूर : आयुष्यभर मुलांच्या संगाेपनात, त्यांच्या प्रगतीसाठी आयुष्य खर्ची घातल्यानंतर सोनेरी दिवस येतील आणि रोजची सायंकाळही आनंदाची असेल, अशी अपेक्षा ज्येष्ठांची असते. मात्र, मुले दूर गेल्याने मावळतीलाही त्यांना संघर्ष करावा लागताेय. उपराजधानीत अशा ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. (Senior Citizens Day)

काेराेना महामारीच्या काळात या ज्येष्ठांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला आणि त्यामुळे अशा नागरिकांची अडचण प्रकर्षाने समाेर आली. ज्येष्ठांची अनेक जाेडपी आहेत, ज्यांची मुले विदेशात सेटल झाली आहेत. उच्चभ्रू वस्त्यांमध्ये ही समस्या वाढली आहे. शिवाय काही असेही आहेत, ज्यांनी आई-वडिलांना वाऱ्यावर साेडून वेगळा संसार थाटला आहे. पडत्या काळात आधार देणारे कुणीच नसल्याने लहान-लहान गाेष्टींसाठीही ज्येष्ठांना संघर्ष करावा लागताे. काहींची अवस्था तर दयनीय झाली आहे. अनेकांना चालणेही मुश्किल आहे. त्यांना दुधापासून किराणा ते रुग्णालयात जाण्यापासून औषध आणण्यासाठी कुणीतरी आधार देईल, याची प्रतीक्षा असते. पैसे संपले की बॅंकेत जाणेही मुश्किल असते आणि पैसे काढण्यासाठी कुणावर विश्वासही ठेवता येत नाही, अशी त्यांची द्विधा अवस्था झाली आहे. काेराेना काळात काही सामाजिक संस्थांनी मदत केली पण पुढे काय, हा प्रश्न आहे.

पाेलिसांचा ‘भराेसा’, ५८७६ ज्येष्ठांची नाेंद

अशा ज्येष्ठांच्या सेवेसाठी पाेलीस विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाेलिसांच्या ‘भराेसा सेल’ने त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी निवारणासाठी सेलची विशेष विंग कार्यान्वित करण्यात आली. याआधारे शहरातील ५,८७६ ज्येष्ठांची नाेंद आतापर्यंत करण्यात आली. त्यात २३१ जाेडपी किंवा एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांचा समावेश आहे. केवळ तक्रार निवारणच नाही तर त्यांना औषधे, किराणा, दवाखान्यात नेण्यापासून ते जेवणाचा डबा लावून देण्यापर्यंतचे काम भराेसा सेलच्या टीमने केले आहे.

ज्येष्ठांविरूद्धच्या गुन्ह्यातही वाढ

देशात ज्येष्ठ नागरिकांविरूद्ध हाेणाऱ्या गुन्ह्यामध्ये सातत्य आहे. २०१८ मध्ये २४३४९, २०१९ मध्ये २७८०४ तर २०२० मध्ये २४७९४ गुन्हे घडले. महाराष्ट्रात या काळात अनुक्रमे ५९६१, ६१६३ व ४९०९ गुन्हे घडले. यामध्ये जखमी करण्याच्या १५३९, हल्ल्याच्या ४५, चाेरीच्या १०७०, लुटपाटीच्या २३८, खंडणी मागण्याच्या १८, ज्येष्ठांच्या संपत्तीवर अतिक्रमण करण्याच्या १०६, फसवणुकीच्या ८६६ घटनांचा समावेश आहे. या काळातील ६४४९ गुन्हे प्रलंबित असून ५५.८ टक्केवारी आहे.

टॅग्स :SocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिक