शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 20:54 IST

Nagpur News मुलांना ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

ठळक मुद्दे शाळेत आल्यास पाळावे लागतील सर्व नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शाळा सुरू करण्याचे निर्देश आले आहेत आणि त्यानुसार शाळा तयारीलाही लागल्या आहेत. मात्र, सुरक्षेची चिंता लक्षात घेत, ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता कमजाेर हाेत असल्याचे दिसत असल्याने राज्य शासनाने ४ ऑक्टाेबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व तसे निर्देश विविध जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिले. शाळा सुरू करताना काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळांनीही आता तयारी चालविली आहे. मात्र, काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून पालकांमध्ये अद्याप भीती असून, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मुलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल करीत पालकांनी चिंता मांडली आहे. यावर शाळांनी एक ताेडगा काढला आहे. नागपूर शहरातील शाळा चालकांनी पालकांसमाेर दाेन्ही पर्याय ठेवले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा विद्यार्थ्यांची व्यवस्था करतील; पण हायजीनची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर राहील, असे शाळांनी स्पष्ट केले. शाळांनी पालकांना पत्र पाठवून शाळेत पाठविणे किंवा ऑनलाईन शिकविणे, यावर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. दाेन्ही पर्यायांसाठी शाळा तयार असून, निवडण्याची जबाबदारी पालकांवर अवलंबून राहील. पालकांनी तसा फाॅर्म भरून शाळेत सादर करायचा आहे. दरम्यान, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली ठरविली असून, त्याचे पत्रकही पालकांना साेपविण्यात आले आहे.

 

शाळेत याल तर हे नियम असतील

- दरराेज कपडे धुवावे लागणार असल्याने गणवेश बंधनकारक राहणार नाही. काेणतेही स्वच्छ कपडे घालून येता येईल.

- शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्याने मास्क घालणे बंधनकारक असेल.

- मुलांनी घरूनच पुरेसे पिण्याचे पाणी आणावे.

- साेबत सॅनिटायझर ठेवून ते थाेड्या थाेड्या वेळाने वापरावे लागेल.

- पालकांनीच त्यांच्या पाल्यांना वेळेत शाळेत साेडावे लागेल आणि घरीही न्यावे लागेल.

- विद्यार्थ्यांनी वर्गात त्यांच्यासाठी ठरविलेल्या बेंचवरच बसायचे आहे.

 

काय करू नये

- मुलांनी त्यांची जागा साेडू नये.

- विद्यार्थ्यांनी जेवणाचा डबा शाळेत आणू नये. कारण मधली जेवणाची सुटी राहणार नाही.

- विद्यार्थ्याला किंवा घरच्या कुठल्याही सदस्याला आराेग्यविषयक समस्या असेल किंवा आजार असेल तर पालकांनी त्याला शाळेत पाठवू नये.

- पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल.

टॅग्स :Schoolशाळा