शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना शाळेत पाठविता की ऑनलाईनचा पर्याय निवडता? निर्णय पालकांनाच घ्यायचा आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 20:54 IST

Nagpur News मुलांना ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

ठळक मुद्दे शाळेत आल्यास पाळावे लागतील सर्व नियम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शाळा सुरू करण्याचे निर्देश आले आहेत आणि त्यानुसार शाळा तयारीलाही लागल्या आहेत. मात्र, सुरक्षेची चिंता लक्षात घेत, ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे.

काेराेनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आता कमजाेर हाेत असल्याचे दिसत असल्याने राज्य शासनाने ४ ऑक्टाेबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व तसे निर्देश विविध जिल्ह्यांच्या प्रशासनाला दिले. शाळा सुरू करताना काेराेना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळांनीही आता तयारी चालविली आहे. मात्र, काेराेनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेवरून पालकांमध्ये अद्याप भीती असून, मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मुलांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल करीत पालकांनी चिंता मांडली आहे. यावर शाळांनी एक ताेडगा काढला आहे. नागपूर शहरातील शाळा चालकांनी पालकांसमाेर दाेन्ही पर्याय ठेवले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा विद्यार्थ्यांची व्यवस्था करतील; पण हायजीनची काळजी घेण्याची जबाबदारी पालकांवर राहील, असे शाळांनी स्पष्ट केले. शाळांनी पालकांना पत्र पाठवून शाळेत पाठविणे किंवा ऑनलाईन शिकविणे, यावर निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. दाेन्ही पर्यायांसाठी शाळा तयार असून, निवडण्याची जबाबदारी पालकांवर अवलंबून राहील. पालकांनी तसा फाॅर्म भरून शाळेत सादर करायचा आहे. दरम्यान, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली ठरविली असून, त्याचे पत्रकही पालकांना साेपविण्यात आले आहे.

 

शाळेत याल तर हे नियम असतील

- दरराेज कपडे धुवावे लागणार असल्याने गणवेश बंधनकारक राहणार नाही. काेणतेही स्वच्छ कपडे घालून येता येईल.

- शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्याने मास्क घालणे बंधनकारक असेल.

- मुलांनी घरूनच पुरेसे पिण्याचे पाणी आणावे.

- साेबत सॅनिटायझर ठेवून ते थाेड्या थाेड्या वेळाने वापरावे लागेल.

- पालकांनीच त्यांच्या पाल्यांना वेळेत शाळेत साेडावे लागेल आणि घरीही न्यावे लागेल.

- विद्यार्थ्यांनी वर्गात त्यांच्यासाठी ठरविलेल्या बेंचवरच बसायचे आहे.

 

काय करू नये

- मुलांनी त्यांची जागा साेडू नये.

- विद्यार्थ्यांनी जेवणाचा डबा शाळेत आणू नये. कारण मधली जेवणाची सुटी राहणार नाही.

- विद्यार्थ्याला किंवा घरच्या कुठल्याही सदस्याला आराेग्यविषयक समस्या असेल किंवा आजार असेल तर पालकांनी त्याला शाळेत पाठवू नये.

- पालकांनी शाळेच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई असेल.

टॅग्स :Schoolशाळा