शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

विक्रेत्यांची नागपुरातील मोहल्ल्यात फिरून भाज्यांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:50 IST

सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही.

ठळक मुद्देरस्त्याच्या कडेला दुकाने : मनपातर्फे पासेसचे वितरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : साफसफाई आणि सॅनिटाईज्ड करण्यासाठी कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यावर उपाय म्हणून आयुक्तांनी उत्पादक शेतकऱ्यांना शहराबाहेर आणि मोहल्ल्यात जाऊन गर्दी होऊ न देता भाजी विक्रीला परवानगी दिली आहे. त्यानुसार सोमवारी भाजी विक्रेत्यांनी मोहल्ल्यात जाऊन तसेच रस्त्याच्या कडेला दुकाने लावून भाज्यांची विक्री केली. त्यामुळे नागरिकांना भाज्यांची टंचाई जाणवली नाही. आवक जास्त असल्याने भावही आटोक्यात होते.

आयुक्तांच्या निर्देशानुसार शहराबाहेरील जवळपास तीन ते चार विक्रेत्यांनी मनपाकडून पासेस घेतल्याची माहिती आहे. याशिवाय काहींनी बाजारात दुकाने लावली. लोकांनीही मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी केली. मौदा आणि लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी पारडी भागात, तर उमरेड रोडवरील गावातील शेतकऱ्यांनी दिघोरी भागात भाज्यांची दुकाने थाटली. त्यामुळे शहरात भाज्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसली नाही. कॉटन मार्केटमध्ये शनिवार आणि रविवारी हजारो ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. कलम १४४ चे उल्लंघन झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी ३१ मार्चपर्यंत कॉटन मार्केटमधील दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. याची माहिती शेतकºयांना न मिळाल्याने शहराबाहेरील शेतकºयांनी कॉटन मार्केटमध्ये गाड्या भरून भाजीपाला आणला होता.मौदा भागातील शेतकरी दिनकर जीवतोडे यांनी सक्करदरा भागात भाजीचे दुकान लावले. ते म्हणाले, मध्यंतरी आलेल्या पावसामुळे टमाटर, हिरवी मिरची, वांगे, कोथिंबीर आणि अन्य भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आले आहे. माल काढला नाही तर शेतातच खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे मिळेल त्या भावात विकण्याची तयारी आहे. शेतातून दररोज माल काढून बाजारात आणावा लागत आहे. कॉटन मार्केट आणि कळमना भाजीबाजार बंद असल्याने खुल्या बाजारात विक्री करीत आहे. मंगळवारी कळमना बाजारपेठ खुली होणार असल्याने तिथे माल विक्रीस नेणार आहे.कळमना भाजीबाजार आजपासून सुरू होणारकळमना भाजीबाजार मंगळवारपासून सुरू होणार असल्याने ग्राहकांची गर्दी होणार आहे. शहरातीन सर्वच विक्रेते या बाजारात हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर कसे नियंत्रण मिळवायचे, हे प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरणार आहे. किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना मर्यादित संख्येत आत सोडावे लागेल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सचिव राजेश भुसारी यांनीही त्याकरिता तयारी चालविली आहे. यानंतरही विक्रेत्यांना कलम १४४ चे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :vegetableभाज्याnagpurनागपूर