शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

ज्ञानज्योतीसाठी जिल्ह्यातून चार शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST

ठाकरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ...

ठाकरे :

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यामध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांचे राज्यस्तरासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले.

जिल्ह्यात व्हीएसटीएफ- मिशन १०० आदर्श शाळा हे अभियान राबविण्यात आले असून, त्या अभियानाचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी चार शाळांची निवड केली. यात पारशिवनी तालुक्यातील ढवळापूर येथील आदिवासी शाळा, भिवापूर तालुक्यातील मानोरा आणि रामटेक तालुक्यातील सावरा या बिगर आदिवासी तसेच कुही तालुक्यातील वग येथील शाळेचा समावेश आहे.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, श्रीमती माणिक हिमाणे, पी.के. बमनोटे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, विस्तार अधिकारी रमेश चरडे, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी किरण भोयर, तालुका समन्वयक रुपेश जवादे, कैलास लोखंडे, अविनाश मानकर, अंकित देशमुख उपस्थित होते.

पारशिवनी आणि रामटेक तसेच कुही आणि भिवापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी दुसऱ्या तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी बैठकीत दिले.

या शाळांमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण तसेच आनंददायी शिक्षण या निकषांचा समावेश आहे. ‍राज्यस्तर ते शाळास्तरापर्यंतचे प्रत्यक्ष नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन विविध उपक्रम राबविण्यासाठी २६ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान या अभियानात समाविष्ट उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळांची पाहणी व मूल्यांकन, गावसभेचे आयोजन, आदर्श शाळा विकास आराखडा, आराखड्यास अंतिम मंजुरी देणे, १० मेंटार्सची निवड करणे आदी होत. हे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.