शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

राज्यात ५० टक्के कापसाची पेरणी मान्यता नसलेल्या बियाणांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:11 IST

शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे.

ठळक मुद्देकृषी विभागही हतबलशेतकऱ्यांना लाभ होत असेल तर मान्यता द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे. परंतु हे बियाणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याने, शासनाने या बियाणांना मान्यता द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.जनुकीय बदलांद्वारे विकसित केलेली बियाणे आणि रोपटे यांना देशात बंदी आहे. या बियाण्यांमध्ये तणनाशकांचा वापर झाला असून, यातील काही ठराविक घटक घातक असून, त्यामुळे कर्करोगसुद्धा होऊ शकतो, हे वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच या बियाणांवर देशभरात बंदी आहे. तरीसुद्धा या बियाणांची अवैधरीत्या विक्री सुरू आहे. जिल्ह्यात झालेल्या कापूस पेरणीतील जवळपास ५० टक्के पेरणी ही या बियाणांद्वारे करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीकडे हे बियाणे आढळेल, त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.तरीसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या बियाणांचा वापर झाला आहे. शासनाच्या कृषी केंद्रातून हे बियाणे विकले गेले नाही. शेतकऱ्यांचे स्वत:चे नेटवर्क असून, या नेटवर्कमधून हे बियाणे विकत घेतले गेले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांनी गुजरात, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यातून विकत घेतले असल्याची माहिती आहे. बियाणे शेतकऱ्यांनी परस्पर मिळविल्याने कृ षी विभागाला सुद्धा अपेक्षित कारवाई करणे शक्य झाले नाही.हे बियाणे गेल्या दोन तीन वर्षापासून काही शेतकरी पेरत आहे. त्यांना उत्पादनात फायदा झाला आहे. शिवाय कापसाचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. शासनाची मान्यता नसली तरी, या बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साध्य होत असल्यामुळे, शासनाने त्यात संशोधन करून, बियाणांना मान्यता द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.- कमलाकर मेंघर, सदस्य, जि.प.

टॅग्स :cottonकापूस