शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यात ५० टक्के कापसाची पेरणी मान्यता नसलेल्या बियाणांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 14:11 IST

शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे.

ठळक मुद्देकृषी विभागही हतबलशेतकऱ्यांना लाभ होत असेल तर मान्यता द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाची मान्यता नसतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर.आर. बीटी बियाणांची पेरणी झाली आहे. हे बियाणे कृषी केंद्रात उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांनी स्वत:चे नेटवर्क बनवून बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे कारवाई कशी करावी, यासंदर्भात कृषी विभाग हतबल आहे. परंतु हे बियाणे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याने, शासनाने या बियाणांना मान्यता द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे.जनुकीय बदलांद्वारे विकसित केलेली बियाणे आणि रोपटे यांना देशात बंदी आहे. या बियाण्यांमध्ये तणनाशकांचा वापर झाला असून, यातील काही ठराविक घटक घातक असून, त्यामुळे कर्करोगसुद्धा होऊ शकतो, हे वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच या बियाणांवर देशभरात बंदी आहे. तरीसुद्धा या बियाणांची अवैधरीत्या विक्री सुरू आहे. जिल्ह्यात झालेल्या कापूस पेरणीतील जवळपास ५० टक्के पेरणी ही या बियाणांद्वारे करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीकडे हे बियाणे आढळेल, त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.तरीसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात या बियाणांचा वापर झाला आहे. शासनाच्या कृषी केंद्रातून हे बियाणे विकले गेले नाही. शेतकऱ्यांचे स्वत:चे नेटवर्क असून, या नेटवर्कमधून हे बियाणे विकत घेतले गेले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांनी गुजरात, आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यातून विकत घेतले असल्याची माहिती आहे. बियाणे शेतकऱ्यांनी परस्पर मिळविल्याने कृ षी विभागाला सुद्धा अपेक्षित कारवाई करणे शक्य झाले नाही.हे बियाणे गेल्या दोन तीन वर्षापासून काही शेतकरी पेरत आहे. त्यांना उत्पादनात फायदा झाला आहे. शिवाय कापसाचा उत्पादन खर्च कमी झाला आहे. शासनाची मान्यता नसली तरी, या बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साध्य होत असल्यामुळे, शासनाने त्यात संशोधन करून, बियाणांना मान्यता द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.- कमलाकर मेंघर, सदस्य, जि.प.

टॅग्स :cottonकापूस