शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नागपूर जिल्ह्यातील भिवापुर बसस्थानकावर विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:56 IST

भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात.

ठळक मुद्देपोलीस तक्रारींचा अभाववाहनचालक, वाहकांसह टवाळखोरांचा जाच

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शिक्षणासाठी भिवापूर येथे बसने ये-जा करतात. ते सायंकाळी घरी परत जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत बसस्थानक परिसरात उभे असतात. त्यातच खासगी वाहनचालक, वाहन आणि टवाळखोर विद्यार्थिनींच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांची छेड काढतात. या गंभीर प्रकारांबाबत पालक पोलिसांत तक्रारी दाखल करीत नसल्याने टवाळखोरांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भिवापूर येथे तालुक्यातील तसेच लगतच्या चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील किमान ३०० विद्यार्थी - विद्यार्थिनी रोज शाळा - महाविद्यालयांमध्ये येतात. सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी बसने प्रवास करतात. भिवापुरातील बसस्थानक केवळ नावालाच आहे. त्यामुळे या विद्यार्थी - विद्यार्थिनींना रोज नागपूर - गडचिरोली महामार्गाच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. सायंकाळी या ठिकाणी विद्यार्थी - विद्यार्थिनींची चांगलीच गर्दी असते. त्यात इतर प्रवाशांची भर पडते. या मार्गावर नियमित धावणाऱ्या खासगी वाहनांचे चालक, वाहक तसेच शहरातील व बाहेरचे टवाळखोर विकृत इशारे, अश्लिल शिवीगाळ करीत विद्यार्थिनींना त्रास द्यायला सुरुवात करतात. दोन शालेय विद्यार्थिनी गुरुवारी (दि. २२) सायंकाळी भिवापुरातील बसस्थानक परिसरात उभ्या होत्या. त्यातच तीन तरुणांनी दोघांनीही पाणीपुरी खाण्याच्या निमित्ताने बोलावले. घाबरलेल्या विद्यार्थिनी वेळीच सावध झाल्या आणि त्यांनी हा प्रकार एका दुकानदाराला सांगितला. दुकानदाराने त्या तरुणांना हटकले असता तरुणांनी दुकानदारावरच हात उगारला. त्यामुळे दुकानदाराने पोलिसांची मदत घेतली. परिणामी, दोघांनीही पळ काढला.पुढे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत ठाण्यात आणले. विद्यार्थिनींकडून त्यांची ओळखपरेड करवून घेतली. शिवाय, विद्यार्थिनींचे पालकही ठाण्यात दाखल झाले. मात्र, त्यांनी तक्रार नोंदविण्यास असमर्थता दर्शविली. ठाणेदार हर्षल येकरे यांनी विद्यार्थिनी व पालकांना विश्वासात घेत तक्रार करण्याची विनंती केली. परंतु, पालकांनी तक्रार नोंदविली नाही. असेच प्रकार यापूर्वीही घडले आहे. दिवसेंदिवस असल्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने एकीकडे, टवाळखोरांची हिंमत वाढत असून, दुसरीकडे विद्यार्थिनींच्या मनात भीती निर्माण होत आहे. ही बाब निकोप समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.

बसचालकास चोप५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे होते. बस बरीच उशिरा आल्याने चढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. त्यातच चालकाने बस सुरू करून पुढे नेली. त्यामुळे एक विद्यार्थिनी रोडवर पडली. या प्रकारामुळे विद्यार्थी चिडले आणि त्यांनी बसचालकास प्रसाद द्यायला सुरुवात केली. दरम्यान, प्रवाशांनी मध्यस्थी करून बसचालकास सोडविले.

पालकांमध्ये भीतीभिवापूरच्या बसस्थानक परिसरात रोज सायंकाळी ५.१५ वाजतापासून रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी बसची प्रतीक्षा करीत उभे असतात. या काळात विद्यार्थिनींना नको ते अनुभव येतात. या प्रकाराबाबत बहुतांश विद्यार्थिनी भीतीपोटी पालकांना काहीही सांगत नाही. सांगितल्यास पालकाही त्याकडे गांभीर्याने बघत पोलिसांत तक्रार दाखल करत नाही. पोलिसांत तक्रार दाखल केल्यास समाजात आपली व मुलीची बदनामी होईल किंवा टवाळखोर वचपा काढतील, अशी भीती पालकांच्या मनात आहे. तक्रारीअभावी पोलिसांनाही टवाळखोरांविद्ध ठोस कारवाई करता येत नाही.

छोट्या विद्यार्थ्यांचे हालतालुक्यातील तास, जवराबोडी, नक्षी, मांगली, मेढा, तातोली, जवळी येथील छोटे विद्यार्थी रोज आॅटोने भिवापूर येथील खासगी कॉन्व्हेंटमध्ये येतात. कमी वेळ, डिझेलची बचत व अधिक कमाई या हव्यासापोटी आॅटोचालक या चिमुकल्यांना आॅटोमध्ये गुरांप्रमाणे कोंबतात. मागील वर्षी आॅटो उलटून काही छोटे विद्यार्थी जखमी झाले होते. हा अनुभव असतानाही या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केली नाही. हा प्रकार पालक व शाळा व्यवस्थापनाला माहिती असूनही कुणीही गांभीर्याने घेत नाही. हे आॅटो ना शाळेचे आहे ना शासनाचे. मग यांना विद्यार्थ्यांची ने - आण करण्याची परवानगी दिली कुणी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

टॅग्स :Crimeगुन्हा