शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कळमन्यात काेट्यवधींच्या कृषी मालाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 20:39 IST

Nagpur News ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले.

ठळक मुद्देमंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीमुळे अनास्था उघड११४ एकरच्या परिसरात अग्निशमन यंत्रणाच नाही

नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड नागपूर शहराच्या वैभवात आणि उत्पन्नात भर घालणारा, आशिया खंडातील सर्वात मोठा, सर्व सोयी आणि सुविधांनी परिपूर्ण असलेला, लाखो मेट्रिक टन कृषिमालाची खरेदी-विक्री करणारा आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा बाजार आहे, असा गौरव नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वेबसाइटवर करण्यात आला आहे. वेबसाइटवर दिलेल्या गौरवातील सर्व सोयी व सुविधांनी परिपूर्ण असल्याचा केलेला दावा मात्र मंगळवारी मध्यरात्री मिरचीच्या यार्डला लागलेल्या आगीने फोल ठरविला आहे. ‘लोकमत’ने कळमना मार्केटच्या ११४ एकर परिसरांतील कृषिमालाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला असता, येथे अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे उघड झाले.

देशभरातून आणि देशाबाहेरूनही कृषिमाल या कळमना मार्केटात येतो. लाखो शेतकरी, हजारो अडत्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार होतो. कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होते. कोट्यवधीचे धान्याची विल्हेवाट लागेपर्यंत कृषिमाल यार्डमध्ये साठविला जातो. त्यामुळे या कृषिमालाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अवाढव्य परिसर आणि मोठाले २६ यार्ड, ज्यूट आणि प्लास्टीकच्या पोत्यांमध्ये भरलेला खचाखच कृषिमाल धान्य बाजार, आलू-कांदे बाजार, मिरची बाजार, फळ बाजारात आहे. त्याचबरोबर, गुरांचा बाजारही येथे आहे, पण आगीच्या संदर्भात उपाययोजना येथे शून्य आहे. मिरचीच्या यार्डमध्ये लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागल्याची सांगण्यात येते. येथे मोठ्या संख्येने मजूर काम करतात. सिगारेट, बिडी ओढतात, छोट्या-मोठ्या कॅन्टीन येथे उघड्यावर आहे. फळ, भाज्यांचा कचरा येथे मोठ्या प्रमाणात निघतो. कचऱ्याला आगी लागल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत. विद्युत संयंत्र येथे आहे.

- अग्निरोधक यंत्रच नाहीत

ज्या यार्डमध्ये मिरची जळाली, तिथे फायर एक्स्टिंग्विशर लटकविण्यासाठी अँगल लावले होते, पण तिथे फायर एक्स्टिंग्विशर चोरून नेल्याचे सांगण्यात आले. इतरही यार्डचे निरीक्षण केले असता, तिथेही अग्निरोधक संयंत्र नव्हते. अडत्यांच्या कार्यालयात आणि समितीच्याही कार्यालयात अग्निरोधक संयंत्र दिसून आले नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाण्याच्या टाक्या आहेत, पाणीही मुबलक आहे, पण फायर हायड्रेन सीस्टिम एकाही यार्डला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेवरच मार्केटची सुरक्षा आहे.

- १९९२ मध्येही लागली होती आग

१९७४ मध्ये नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रस्थापित झाली. १९८१ मध्ये बाजार समितीला नागपूर सुधार प्रन्यासने ११० एकर जागा दिली.

१९९२ मध्ये पं.जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण झाले. १९९२ मध्ये मिरचीच्या यार्डमध्ये अशीच आग लागली होती. त्यानंतरही अग्निरोधक यंत्रणा येथे लावण्यात आली नव्हती. याच वर्षात मार्केटच्या कचऱ्यामध्ये आग लागली असल्याचे कळमना अग्निशमन कार्यालयातून सांगण्यात आले.

माती परीक्षण केंद्र

- आता कृषिमालाच्या सुरक्षेचा विषय समितीने गंभीरतेने घेतला. दुसऱ्याच दिवशी आर्किटेकला बोलावून संपूर्ण यार्डात अग्निशमन यंत्रणा बसविण्यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. ७ दिवसांत आर्किटेकने आराखडा दिल्यानंतर तो संचालक मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल आणि लवकरात लवकर कळमना मार्केट अग्निशमन यंत्रणेने स्वयंपूर्ण होईल. स्वत:ची अग्निशमनची गाडी २४ तास येथे उपलब्ध राहिल.

अहमदभाई करीमभाई शेख, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर.

टॅग्स :fireआग