शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिखल हटवण्यावरून  नागपुरात सुरक्षा रक्षकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 20:31 IST

चिखल हटवण्यावरून झालेल्या शुल्लक वादात एका युवकाने कार्यालयातील सुरक्षा रक्षकाचा खून केला. ही घटना कळमना येथील चिखली ले आऊट येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देकळमन्यातील घटना : आरोपी तरुणास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिखल हटवण्यावरून झालेल्या शुल्लक वादात एका युवकाने कार्यालयातील सुरक्षा रक्षकाचा खून केला. ही घटना कळमना येथील चिखली ले आऊट येथे रविवारी घडली. पोलिसांनी आरोपी गोलू वासनिक (२१) रा. मानेवाडा याला अटक केली आहे. नारायण भिवापूरकर (५०) रा. कोष्टीपुरा, भांडेवाडी असे मृताचे नाव आहे.मृत भिवापूरकर हे कळमन्यातील मेहता धर्मकाटा येथील कार्यालयात सुरक्षारक्षकाचे काम करीत होते. तर गोलू वासनिक हा त्याच कार्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर होता. नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता भिवापूरकर कामावर आले. पावसामुळे धर्मकाट्यावर चिखल पसरला होता. गोलूने भिवापूरकरला चिखल साफ करण्यास सांगितले. भिवापूरकरने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. यावरून गोलूने त्याच्याशी वाद घातला. परंतु भिवापूरकरने लक्ष दिले नाही. यावरून गोलू दिवसभर टोमणे मारत होता. तरीही त्यांनी लक्ष दिले नाही. दुपारी गोलू जेवण करायला गेला. तो सायंकाळी ५ वाजता परत आला. काही वेळ कार्यालयात बसल्यानंतर गोलूने फावडा हातात घेतला. त्यावेळी भिवापूरकरही कार्यालयातच बसून होते. गोलूने फावड्याने भिवापूरकरवर हल्ला केला. त्याने भिवापूरकरच्या डोक्यावर पाच-सहा वार केले. यात भिवापूरकर गंभीर जखमी झाले. त्यांचा आरडाओरड एकूण धर्मकाट्यावरील कर्मचारी शेखर गजभिये धावून आला. परंतु गोलूने त्याच्यावरही हल्ला केला. शेखरने स्वत:चा जीव वाचवला. गोलू त्याला मध्ये पडल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन फरार झाला. शेखर आणि त्याच्या साथीदारांनी भिवापूरकरला लगेच वर्धमाननगर येथील राधाकृष्ण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. उपचारादरम्यान भिवापूरकर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गोलूचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पत्नी व मुलगी मानसिक धक्कयातगोलू आणि भिवापूरकर यांच्यात सकाळपासूनच वाद सुरू होता. इतर कर्मचाऱ्यांनाही याची कल्पना होती. परंतु याला शुल्लक वाद समजून कुणीही गांभीर्याने घेतले नाही. भिवापूरकरच्या कुटुंबात पत्नी जीजाबाई आणि एक विवाहित मुलगी रेणुका आहे. जीजाबाई गृहिणी आहे. भिवापूरकर यांच्याच भरवशावर घर चालत होते. या घटनेनंतर पत्नी जीजाबाई व मुलगी रेणुका यांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.गोलू हा सकाळपासूनच बदला घेण्याचा तयारीत असावा असा संशय आहे. जेवण करून आल्यानंतर तो ज्या पद्धतीने भिवापूरकरला पाहत होता, त्यावरून ही बाब आढळून येते. खुनाची ही घटना कार्यालयातील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून