शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:56 IST

ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देशहीद सैनिकाप्रती पद्मगंधाची कृतज्ञता : शहीद पत्नीला सोपविली मदतराशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान व रसिकराज कला संस्थेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील संजय विक्रमसिंह राजपूत यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत त्यांच्या पत्नी सुषमा राजपूत यांना लोकसहभागातून गोळा झालेला ५१ हजार रुपयांचा निधी कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आला. याप्रसंगी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दीपक लिमसे, पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, रसिकराजचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. अंजली परनंदीवार यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अशोक मोठे म्हणाले, संजय राजपूत हे ११ फेब्रुवारीला नागपूरला येऊन गेले होते. नुकताच त्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवून घेतला होता व ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत परराष्ट्र धोरण मावळ स्वरूपाचे होते. सर्जिकल स्ट्राईक ही धर्मयुद्धाच्या जवळची कल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर १४ दिवसात प्रतिहल्ला करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देणाऱ्या सुषमा राजपूत ‘धन्यवाद’ या शब्दाशिवाय काहीच बोलू शकल्या नाही. बाकीच्या भावना अश्रु रूपात बाहेर आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया ब्राह्मणकर यांनी केले. संचालन स्वाती मोहरीर यांनी केले. परिणिता कवळेकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnagpurनागपूर