शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:56 IST

ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देशहीद सैनिकाप्रती पद्मगंधाची कृतज्ञता : शहीद पत्नीला सोपविली मदतराशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान व रसिकराज कला संस्थेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील संजय विक्रमसिंह राजपूत यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत त्यांच्या पत्नी सुषमा राजपूत यांना लोकसहभागातून गोळा झालेला ५१ हजार रुपयांचा निधी कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आला. याप्रसंगी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दीपक लिमसे, पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, रसिकराजचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. अंजली परनंदीवार यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अशोक मोठे म्हणाले, संजय राजपूत हे ११ फेब्रुवारीला नागपूरला येऊन गेले होते. नुकताच त्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवून घेतला होता व ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत परराष्ट्र धोरण मावळ स्वरूपाचे होते. सर्जिकल स्ट्राईक ही धर्मयुद्धाच्या जवळची कल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर १४ दिवसात प्रतिहल्ला करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देणाऱ्या सुषमा राजपूत ‘धन्यवाद’ या शब्दाशिवाय काहीच बोलू शकल्या नाही. बाकीच्या भावना अश्रु रूपात बाहेर आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया ब्राह्मणकर यांनी केले. संचालन स्वाती मोहरीर यांनी केले. परिणिता कवळेकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnagpurनागपूर