शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:56 IST

ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देशहीद सैनिकाप्रती पद्मगंधाची कृतज्ञता : शहीद पत्नीला सोपविली मदतराशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मगंधा प्रतिष्ठान व रसिकराज कला संस्थेतर्फे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या विदर्भातील संजय विक्रमसिंह राजपूत यांच्याप्रती संवेदना व्यक्त करीत त्यांच्या पत्नी सुषमा राजपूत यांना लोकसहभागातून गोळा झालेला ५१ हजार रुपयांचा निधी कृतज्ञतापूर्वक समर्पित करण्यात आला. याप्रसंगी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन दीपक लिमसे, पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, रसिकराजचे अध्यक्ष डॉ. बळवंत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते. अंजली परनंदीवार यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगो...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.अशोक मोठे म्हणाले, संजय राजपूत हे ११ फेब्रुवारीला नागपूरला येऊन गेले होते. नुकताच त्यांनी आपला कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवून घेतला होता व ११५ बटालियनमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत परराष्ट्र धोरण मावळ स्वरूपाचे होते. सर्जिकल स्ट्राईक ही धर्मयुद्धाच्या जवळची कल्पना असल्याचे ते म्हणाले. यावेळी कॅप्टन दीपक लिमसे यांनी पुलवामा हल्ल्यानंतर १४ दिवसात प्रतिहल्ला करणाऱ्या सैनिकांच्या कारवाईचे कौतुक केले. सत्काराला उत्तर देणाऱ्या सुषमा राजपूत ‘धन्यवाद’ या शब्दाशिवाय काहीच बोलू शकल्या नाही. बाकीच्या भावना अश्रु रूपात बाहेर आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया ब्राह्मणकर यांनी केले. संचालन स्वाती मोहरीर यांनी केले. परिणिता कवळेकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाnagpurनागपूर