शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

असंघटित कामगारांसाठी सुरक्षा मंडळ आवश्यक

By admin | Updated: October 23, 2016 02:44 IST

असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतेही कायदे नाहीत. एखादा अपघात झाल्यास या कामगाराला नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने

न्या. भूषण गवई : राष्ट्रीय विधी सेवा योजनेच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचे उद्घाटननागपूर : असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतेही कायदे नाहीत. एखादा अपघात झाल्यास या कामगाराला नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर सुरक्षा मंडळाची अत्यंत आवश्यकता आहे, अशी तळमळ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाच्या विधिसेवा उपसमितीचे अध्यक्ष आणि पालक न्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधिसेवा उपसमिती आणि नागपूर जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाने असंघटित कामगार क्षेत्राकरिता विधिसेवा योजना तयार केली. या योजनेच्या अंमलबजावणी मोहिमेच्या शुभारंभाचे उद्घाटन करताना न्या. गवई बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन उच्च न्यायालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. गवई पुढे म्हणाले की, संघटित कामगारांसाठी कायदे आहेत. त्यामुळे त्यांना सामूहिक वाटाघाटीचा अधिकार आहे. ते आपले हक्क प्राप्त करण्यासाठी व्यवस्थापनासोबत लढा देऊ शकतात. तथापि या असंघटित कामगारांसाठी एकही कायदा नाही. त्यांच्याकडे सामूहिक वाटाघाटी करण्याचा अधिकारच नसल्याने ते आपली गाऱ्हाणी आणि मागण्या मांडण्यात असमर्थ आहेत. त्यामुळे मुकाट्याने त्यांचे शोषण होत आहे. राज्य घटनेत मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत. कार्यकारी मंडळाकडून ही मार्गदर्शक तत्त्वे प्रभावी होण्यासाठी कायदेमंडळाने कायदे तयार केले आहेत. ही तत्त्वे प्रभावीपणे अमलात आणणे राज्याचे कर्तव्य आहे. राज्य घटनेच्या कलम ३९ ते ४३ मध्ये सर्व नागरिकांना (स्त्री आणि पुरुष)कामाचा समान अधिकार आहे. खऱ्या अर्थाने मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या ५१ वर्षानंतर २००८ मध्ये सामाजिक सुरक्षा सेवा कायदा अमलात आला. समाजातील शेवटच्या माणसाला अन्न, वस्त्र, निवारासोबतच वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा मिळण्यासाठी आपण एकत्रपणे कार्य केले पाहिजे, असेही न्या. गवई म्हणाले. (प्रतिनिधी)विकासकामात असंघटित कामगारांचा वाढावा सहभाग : बावनकुळेअसंघटित कामगारांच्या जीवनात प्रकाश यावा, त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मेट्रो रेल्वे, उड्डाणपूल, मिहान प्रकल्प आदी ३० हजार कोटींहून अधिक खर्चांची सरकारकडून विकासकामे केली जात आहेत. या विकासकामांमध्ये असंघटित कामगारांच्या अधिकाधिक सहभागावर अधिक भर दिला जाणार आहे, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर, महाराष्ट्र विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव सुनील.के. कोतवाल, प्रधान जिल्हा न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, उच्च न्यायालयाचे प्रबंधक एम. एस. शर्मा, न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे, जिल्हा व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव कुणाल जाधव या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी असंघटित कामगारांना ओळखपत्रांचे आणि त्यांच्या पाल्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ‘न्याय सर्वांसाठी’चे प्रकाशनयाप्रसंगी ‘न्याय सर्वांसाठी’ या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रधान जिल्हा न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, न्यायमूर्ती ए. एस. चांदूरकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उच्च न्यायालयाचे प्रबंधक सदस्य सचिव एम.एस. शर्मा तर संचालन डॉ. सीमा पांडे यांनी केले. आभार जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव कुणाल जाधव यांनी मानले. या कार्यक्रमात वकील संघटनेचे प्रतिनिधी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.