शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढला ३० टक्क्याने मानसिक आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ४,७८८ रुग्णांचे बळी गेले आहेत. याचा मोठा प्रभाव मानसिक आरोग्यावरही पडला आहे. आजाराची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: या आजारात ज्यांनी लहान मूल, तरुण व कर्ता व्यक्ती गमावला आहे, त्या कुटुंबातील नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचे पुढे आले आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मनावरही झाला आहे. काही रुग्णांमध्ये व सामान्यांमध्ये इतकी जबरदस्त भीती व चिंता वाढली आहे की, त्यांच्यावरील मानसिक परिणाम दुरोगामी होण्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी यांच्यानुसार, कोरोनाचा शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामापेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकतो. यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याने मेयोच्या मानसिक रोग विभागात महिन्याला जवळपास ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ही संख्या मोठी आहे.

- आजार होऊ नये याची अतिकाळजी तर, काहींना पुन्हा आजार होण्याची भीती

डॉ. सोमानी म्हणाले, मानसिक रोगाच्या रुग्णांमध्ये तीन प्रकारचे रुग्ण दिसून येत आहेत. पहिल्या प्रकारात कोरोना होऊ नये याची खूप जास्त काळजी घेणारे रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण पुन्हा पुन्हा हात धुतात. काही रुग्ण कोरोना होईल या भीतीने घराबाहेर जाण्यास टाळतात, घरातही कुणाला येऊ देत नाही. दुसऱ्या प्रकारात कोरोनातून बरे झालेले परंतु पुन्हा आजार होण्याची भीती बाळगून असलेले रुग्ण आहेत. अशा रुग्णांमध्ये थोडे जरी डोके दुखले किंवा शिंक आली तर कोरोना तर नाही ना अशी हुरहुर लागते. सध्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची मोठी धास्ती पाहायला मिळत आहे. असे रुग्ण समुपदेशाने बरे होतात.

- तिसऱ्या प्रकारातील रुग्णांना औषधोपचाराची गरज

ज्या कुटुंबात कोरोनामुळे लहान मूल, तरुण किंवा कर्ता व्यक्ती मृत पावला आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या मनावर मोठा आघात झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रभावित मानसिक आजाराच्या या तिसऱ्या प्रकारातील रुग्णाची संख्या अलीकडे वाढली आहे. यांच्यात नैराश्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे. आयसीयूमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या वयोवृद्धांमध्ये भ्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचेही डॉ. सोमानी म्हणाले.

- अनिश्चिततेचा विचार आला की सजग व्हा

कोरोनाचा हा प्रादुर्भाव पुढचे काही दिवस वा महिने टिकू शकतो, म्हणूनच मनाला बदल मिळू देणे महत्त्वाचे आहे. जमेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जा, सूर्यप्रकाशात जाणे अधिक चांगले. व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मनामध्ये अनिश्चिततेचा विचार आला की त्याबद्दल सजग व्हा. विचार करून काहीही फायदा होणार नाही, असे स्वत:ला समजवा.

-डॉ. अभिषेक सोमानी, मानसिक रोग विभाग, मेयो