शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

मनाला स्पर्श करणारे ‘ऋतुस्पर्श’

By admin | Updated: November 26, 2014 01:06 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट अनुबंधाचा वेध घेणारे हे नाटक नितीन नायगावकर या नवोदित नाटककाराच्या कुशल लेखन प्रतिभेचा परिचय देणारे होते. हे नाटक श्याम पेठकर लिखित ‘ऋतुस्पर्श’ या ललितबंधावर आधारित होते. लेखक, दिग्दर्शक व सहभागी कलाकारांनी दर्शकांना पहिल्या प्रयत्नातच जिंकले. मानवी जीवनात अविरतपणे फिरणाऱ्या ऋतुचक्राचे रंगरूप व गंध वेगळाच. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अल्लड बालपण, नवथर यौवन, भावुक तारुण्य आणि उत्तरार्धातील आश्वस्त प्रौढत्व व्यक्तिनुरूप विविध अनुभवांचे असते. मात्र जगण्याच्या प्रत्येक वळणावर कितीही खाचखळगे आले, अडचणी आल्या तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपली ओंजळ सुगंधी फुलांनी भरलेली राहण्यासाठी या जगण्यावर, अवतीभवतीच्या माणसांवर, निसर्गातल्या पानाफुलांवर, पक्ष्यांवर मनापासून प्रेम करायला हवे. गावाकडच्या उन्मुक्त वातावरणातील व बंदिस्त शहरातील ऊन-पाऊस-थंडीची अनुभूती नक्कीच वेगळी असते. ज्या शहरात बदलत्या ऋतूंची चाहूल जाणवत नाही, त्या शहरांना खरंतर आभाळच नसते. अन् ज्या तरुण-तरुणींच्या जीवनात प्रीतीची अनिवारता, स्थिरता असते, त्यांच्या जीवनात प्रत्येक ऋतूचे आगमन म्हणजे जणू नवसृजनाचा आनंदोत्सवच असतो. दैनंदिन जीवनातील अशा विविधांगी प्रसंग मालिकांना काव्यात्मक शैलीच्या संवादासह सादर करणारे सूत्रधार विनोद तुंबडे, दिनेश चंदनकर, रेणुका चुटके, मधू जोशी, श्रद्धा तेलंग, निधी चरपे, नमिता माने, ओंकार मुळे, आकाश डोंगरे, हर्षल तामणे, वासंती म्हेत्रे या कलाकारांचे हे सकस सादरीकरण होते. दिग्दर्शन मीनल इथापे, सहदिग्दर्शन कल्याणी उपाध्ये, संगीत भय्या पेठकर तर निर्मिती समीर पंडित यांचे होते.(प्रतिनिधी)