शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

धुळ्याहून एसडीआरएफची तुकडी नागपुरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:19 AM

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास संकटाचा सामना करण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची अतिरिक्त तुकडी बोलावण्यात आली आहे. यात ३४ जवानांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुरात वा साचलेल्या पाण्यात अडकलेल्या ७०० हून अधिक नागरिकांना एसडीआरएफ व अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. परंतु हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास संकटाचा सामना करण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची अतिरिक्त तुकडी बोलावण्यात आली आहे. यात ३४ जवानांचा समावेश आहे. बोट व मदतसाहित्यासह ही तुकडी शनिवारी नागपुरात दाखल झाली आहे.नागपुरात एसडीआरएफच्या दलात १२८ जवान आहेत. त्यांच्या मदतीला धुळे येथून पुन्हा ३४ जवान आले आहेत. आपत्तीच्या काळात जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून मदत व बचाव कार्य राबविले जाते. यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग, एनडीआरएफ विभागाची मदत घेतली जाते. एसडीआरएफचे हिंगणा येथे कॅ म्प आहे. येथील जवानांच्या मदतीला पुन्हा तुकडी बोलावण्यात आली आहे.चार केंद्रात चार बोटीशुक्र वारी अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाला बोटीसह घटनास्थळी पोहचताना अडचणी आल्या. याचा विचार करता सुगतनगर, नरेंद्रनगर, सक्करदरा व सिव्हील लाईन येथील केंद्रात बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच साचलेले पाणी काढण्यासाठी पंप सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.एनएसएसचे विद्यार्थी सज्जआपत्ती काळात मदतीसाठी अग्निशमन विभागाच्या जवानांसोबतच संकटग्रस्तांच्या मदतीला धावून येण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ४० विद्यार्थ्यांनी विभागाकडे नोंदणी केली आहे. तसेच मेजर जकाते महाविद्यालय व प्रहारच्या १२ जणांनी नोंदणी केली आहे.

टॅग्स :floodपूरnagpurनागपूर