शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

पेंचचे पाणी कालव्याऐवजी नदीत

By admin | Updated: October 19, 2014 00:59 IST

मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील

सांडनदीला पूर : पाण्याअभावी धान सुकण्याच्या मार्गावरतारसा : मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाणी कालव्यांऐवजी नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे तारसा-बाबदेव मार्गावरील सांडनदीला पूर आला. मौदा तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान गर्भावस्थेत अर्थात धानाच्या लोंब्यामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत धानाला पाण्याची नितांत गरज असते. या काळात पाणी न मिळाल्यास दाणे भरण्याची प्रक्रिया मंदावते किंबहुना; धान सुकण्याची शक्यताही नाकारता येत येत नाही. भारनियमनामुळे शेतातील विहिरीतील पाण्याचा वापर ओलितासाठी करणे शक्य नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पातील पाणी कालव्यात सोडून ते ओलितासाठी देण्याची मागणी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातील पाणी कालव्यात न सोडता ते नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे लहान नाल्यांसोबतच सांडनदीही सध्या दुथडी भरून वाहत आहे. शेतातील विहिरींमध्ये हल्ली भरपूर पाणीसाठा आहे. परंतु ६ तासांच्या नावाखाली १० ते १५ तास वीजपुरवठा रोज खंडित केला जातो. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पूर्णदाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे मोटारपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. थ्री फेज वीजपुरवठा रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत असतो. सुरळीत करण्यात आलेला वीजपुरवठा मध्येच कधी खंडित होईल, याचाही भरवसा नसतो. त्यानंतर खंडित केला जातो. ज्यांच्या शेतात ओलिताची साधने आहेत, ते शेतकरी रात्र जागून धानाचे ओलित करीत असल्याचे दिसून येते. विजेच्या लपंडावामुळे गावातील नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. परिसरातील बहुतांश गावांमध्ये सध्या तीन ते पाच दिवसाआड नळ सोडले जातात. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी ग्रामीण भागातील आरामशीन, वेल्डिंग वर्कशॉप यासह अन्य व्यवसायधंदे बंद राहात असल्याने त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. (वार्ताहर)