शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेंचचे पाणी कालव्याऐवजी नदीत

By admin | Updated: October 19, 2014 00:59 IST

मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील

सांडनदीला पूर : पाण्याअभावी धान सुकण्याच्या मार्गावरतारसा : मौदा तालुक्यातील धानाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पावसाने दडी मारल्याने पेंच प्रकल्पातील पाणी ओलितासाठी उपलब्ध होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाणी कालव्यांऐवजी नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे तारसा-बाबदेव मार्गावरील सांडनदीला पूर आला. मौदा तालुक्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या धान गर्भावस्थेत अर्थात धानाच्या लोंब्यामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत धानाला पाण्याची नितांत गरज असते. या काळात पाणी न मिळाल्यास दाणे भरण्याची प्रक्रिया मंदावते किंबहुना; धान सुकण्याची शक्यताही नाकारता येत येत नाही. भारनियमनामुळे शेतातील विहिरीतील पाण्याचा वापर ओलितासाठी करणे शक्य नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पातील पाणी कालव्यात सोडून ते ओलितासाठी देण्याची मागणी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांकडे अनेकदा केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पातील पाणी कालव्यात न सोडता ते नदीनाल्यात सोडणे पसंत केले. त्यामुळे लहान नाल्यांसोबतच सांडनदीही सध्या दुथडी भरून वाहत आहे. शेतातील विहिरींमध्ये हल्ली भरपूर पाणीसाठा आहे. परंतु ६ तासांच्या नावाखाली १० ते १५ तास वीजपुरवठा रोज खंडित केला जातो. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतरही पूर्णदाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे मोटारपंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. थ्री फेज वीजपुरवठा रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरळीत असतो. सुरळीत करण्यात आलेला वीजपुरवठा मध्येच कधी खंडित होईल, याचाही भरवसा नसतो. त्यानंतर खंडित केला जातो. ज्यांच्या शेतात ओलिताची साधने आहेत, ते शेतकरी रात्र जागून धानाचे ओलित करीत असल्याचे दिसून येते. विजेच्या लपंडावामुळे गावातील नळ योजना प्रभावित झाल्या आहेत. परिसरातील बहुतांश गावांमध्ये सध्या तीन ते पाच दिवसाआड नळ सोडले जातात. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विजेअभावी ग्रामीण भागातील आरामशीन, वेल्डिंग वर्कशॉप यासह अन्य व्यवसायधंदे बंद राहात असल्याने त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत आहे. (वार्ताहर)