शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पर्यावरण सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या वैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST

जागतिक महिला दिन विशेष निशांत वानखेडे नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची ...

जागतिक महिला दिन विशेष

निशांत वानखेडे

नागपूर : आधुनिकतेच्या स्पर्धेत वेगाने धावणाऱ्या जगात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाने सजीवसृष्टीची व पर्यावरणाची घडी मात्र विस्कटली आहे. विस्कटलेले पर्यावरण सुधारण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक अहोरात्र झटत आहेत. प्रत्येक क्षेत्र काबीज करणाऱ्या महिला या संशोधनाच्या क्षेत्रातही मागे नाहीत. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत (नीरी) अनेक वर्षांपासून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झटणाऱ्या डॉ. अत्या कपले, डॉ. बी. पद्मा राव आणि डॉ. साधना रायलू या वैज्ञानिक म्हणजे जगभरातील अशा समस्त महिला संशोधिकांचे प्रातिनिधिक रूप होय. वेगवेगळ्या संशोधनांच्या माध्यमातून ही भूमी प्रदूषणमुक्त आणि राहण्यायोग्य (लिव्हेबल) ठेवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

डॉ. अत्या कपले

डॉ. अत्या कपले या नीरीमध्ये प्रदूषण नियंत्रण युनिटच्या प्रकल्प प्रमुख आणि रिसर्च सेलच्या संचालिका आहेत आणि गेल्या २५ वर्षांपासून संशोधनाच्या माध्यमातून पर्यावरण प्रदूषण नियंत्रणासाठी सेवा देत आहेत. डॉ. अत्या यांनी हैदराबाद येथून विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर रुरकी विद्यापीठातून बॉयोटेकमध्ये एम.एस्सी. व केंद्रीय विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केल्यानंतर त्यांनी नीरीमध्ये जाॅइन केले. तेव्हापासून पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक प्रकल्पांचा भाग हाेत्या तर अनेक प्रकल्पांचे नेतृत्व त्यांनी केले. २०१९ मध्ये कुंभमेळ्याच्या तयारीच्या वेळी गंगा नदीसमाेरीला नाले स्वच्छतेचे आव्हान त्यांनी स्वीकारले. या प्रकल्पाचे नेतृत्व केले. जैविक अभियांत्रिकी तंत्राद्वारे त्यांनी नाला शुद्धीकरणाचे कार्य केले. त्यामुळे देशभरात हा प्रकल्प उल्लेखनीय ठरला. तेल कंपन्यांमधून हाेणारे ऑइल प्रदूषण नियंत्रणासाठी त्यांनी चालविलेले संशाेधनही माेलाचे ठरत आहे. नाग नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठीही त्यांच्या टीमद्वारे प्रयत्न केले जात आहेत.

डाॅ. बी. पद्मा राव

नीरीमध्ये गेल्या ३० पेक्षा जास्त वर्षापासून सेवा देत असलेल्या डाॅ. बी. पद्मा श्रीनिवास राव या संस्थेच्या लिगल व पर्यावरण पाॅलिसी विभागाच्या प्रमुख आहेत. त्या मूळच्या नागपूरच्या असून एलआयटी महाविद्यालयातून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर दीड वर्ष मुंबई येथे एचपीसीएलमध्ये सेवा दिल्यानंतर नीरीमध्ये कार्य सुरू केले. आपल्या सेवा काळात त्यांनी हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या तज्ज्ञ म्हणून २०० पेक्षा अधिक प्रकल्पांमध्ये संशाेधनाचे कार्य केले. यामध्ये एअर क्वाॅलिटी माॅनिटरिंग, वायू प्रदूषण नियंत्रण, वायू प्रदूषण व्यवस्थापन, पाेल्युशन एमिशन इनव्हेंटरी, पर्यावरणीय ऑडिट, विविध उद्याेगांचे प्रदूषण प्रभाव मूल्यांकनाचे कार्य त्यांनी केले. दिल्ली, मुंबई, काेलकाता, देहरादूनमध्ये प्रदूषणाच्या प्रभावाचा अभ्यास त्यांनी केला. ऑइल रिफायनरीद्वारे चहाच्या मळ्यावर हाेणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून त्यांनी उपाय सुचविला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ५० पेक्षा अधिक पेपर सादर केले. १०० हून अधिक विद्यार्थ्यांना संशाेधनासाठी मार्गदर्शन केले असून, ते विद्यार्थी आज देशविदेशात सेवा देत आहेत. सध्या पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराच्या प्रकल्पावर त्यांचे संशाेधन सुरू आहे.