शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कृषीच्या विकासासाठी विज्ञानाची जोड महत्त्वाची

By admin | Updated: December 13, 2015 02:59 IST

देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी,....

राधामोहन सिंग यांचे प्रतिपादन : ‘अ‍ॅग्रो व्हिजन’च्या कार्यशाळांचे उद्घाटननागपूर : देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित कार्यशाळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. या समारंभात खासदार कृपाल तुमाने व नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, माफसुचे कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, सीआयसीआरचे संचालक डॉ. केशव क्रांती, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संतोष जैन, आनंदराव राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्राशी जोडणारशेतकऱ्यांना आपले उत्पादन देशभरात कोठेही विकता यावे, यासाठी ‘राष्ट्रीय कृषी विपणन केंद्र’ तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षांच्या अखेरपर्यंत देशातील ५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्रांशी जोडण्यात येणार आहे. मार्चपर्यंत २०० बाजारपेठांना जोडण्यात येणार आहे. प्रत्येक बाजाराला ३० लाख आणि आयटी उत्पादने देण्यात येणार आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागपूर ‘कृषी राजधानी’चे शहरनागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून हे शहर कृषी राजधानी व्हावी, अशी प्रतिक्रिया गडकरी यांच्या वक्तव्यानंतर सिंग यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी नितीन गडकरी सक्षम आहेत. त्यांना कृषी क्षेत्राची जाण आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘मृदा आरोग्य पत्रिका’ फायद्याचीकेंद्र्र सरकारच्या कृषी धोरणामध्ये, शेतकऱ्याला आणि त्यांच्या कल्याणास मध्यवर्ती स्थान असून शेतीक्षेत्राचा बहुमुखी विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) यासारख्या योजना सरकारने सुरू केल्याचे राधामोहन सिंग यांनी सांगितले. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल टेस्टिंग कार्ड) दिल्या जातील आणि २०१७ पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनाभारतातील ६० टक्के शेती अजूनही पावसावर असलंबून असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ तयार करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचल, असे नियोजन केंद्र सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खतांच्या असंतुलित वापरामुळे, जमिनीचे आरोग्य तपासून, त्यानुसार संतुलित खतांचा वापर करता यावा, यादृष्टीने ‘मृदा आरोग्य पत्रिका योजना’ अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दृष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची सिंग यांनी प्रशंसा केली. केंद्रातील सरकारने पूर्वीच्या महाराष्ट्र सरकारला सिंचनासाठी ५० हजार कोटी दिले होते, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार प्रकल्पाची सिंग यांनी प्रशंसा केली.