शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

कृषीच्या विकासासाठी विज्ञानाची जोड महत्त्वाची

By admin | Updated: December 13, 2015 02:59 IST

देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी,....

राधामोहन सिंग यांचे प्रतिपादन : ‘अ‍ॅग्रो व्हिजन’च्या कार्यशाळांचे उद्घाटननागपूर : देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे केले. ‘अ‍ॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित कार्यशाळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते. या समारंभात खासदार कृपाल तुमाने व नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, माफसुचे कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, सीआयसीआरचे संचालक डॉ. केशव क्रांती, अ‍ॅग्रो व्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, अ‍ॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संतोष जैन, आनंदराव राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्राशी जोडणारशेतकऱ्यांना आपले उत्पादन देशभरात कोठेही विकता यावे, यासाठी ‘राष्ट्रीय कृषी विपणन केंद्र’ तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षांच्या अखेरपर्यंत देशातील ५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्रांशी जोडण्यात येणार आहे. मार्चपर्यंत २०० बाजारपेठांना जोडण्यात येणार आहे. प्रत्येक बाजाराला ३० लाख आणि आयटी उत्पादने देण्यात येणार आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नागपूर ‘कृषी राजधानी’चे शहरनागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून हे शहर कृषी राजधानी व्हावी, अशी प्रतिक्रिया गडकरी यांच्या वक्तव्यानंतर सिंग यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी नितीन गडकरी सक्षम आहेत. त्यांना कृषी क्षेत्राची जाण आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘मृदा आरोग्य पत्रिका’ फायद्याचीकेंद्र्र सरकारच्या कृषी धोरणामध्ये, शेतकऱ्याला आणि त्यांच्या कल्याणास मध्यवर्ती स्थान असून शेतीक्षेत्राचा बहुमुखी विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) यासारख्या योजना सरकारने सुरू केल्याचे राधामोहन सिंग यांनी सांगितले. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल टेस्टिंग कार्ड) दिल्या जातील आणि २०१७ पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनाभारतातील ६० टक्के शेती अजूनही पावसावर असलंबून असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ तयार करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचल, असे नियोजन केंद्र सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खतांच्या असंतुलित वापरामुळे, जमिनीचे आरोग्य तपासून, त्यानुसार संतुलित खतांचा वापर करता यावा, यादृष्टीने ‘मृदा आरोग्य पत्रिका योजना’ अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दृष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची सिंग यांनी प्रशंसा केली. केंद्रातील सरकारने पूर्वीच्या महाराष्ट्र सरकारला सिंचनासाठी ५० हजार कोटी दिले होते, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार प्रकल्पाची सिंग यांनी प्रशंसा केली.