शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 01:37 IST

सरकार व शिक्षण विभागाचा निषेध : ८६ कोटी रुपये थकीतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील शाळांचे सरकारवर ८५ कोटी १४ लाख ७ हजार रुपये थकीत आहे. आरटीईचा परतावा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, विना अनुदानित शाळांची अवस्था डबघाईस येत आहे. थकीत अनुदानासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ...

सरकार व शिक्षण विभागाचा निषेध : ८६ कोटी रुपये थकीतलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायदा २००९ (आरटीई) अंतर्गत जिल्ह्यातील शाळांचे सरकारवर ८५ कोटी १४ लाख ७ हजार रुपये थकीत आहे. आरटीईचा परतावा देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याने, विना अनुदानित शाळांची अवस्था डबघाईस येत आहे. थकीत अनुदानासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील जवळपास ७०० शाळांनी काळा दिवस साजरा करून, शासन व शिक्षण विभागाचा निषेध केला.आरटीईअंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. त्या मोबदल्यात शासन शाळांना परतावा देते. परंतु २०१२ पासून २०१७ पर्यंत शासनाने आरटीईचा परतावा नियमित दिला नाही. गेल्या तीन वर्षांपासून आरटीईचा एकही रुपया शाळांना मिळाला नाही. यासंदर्भात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्टडीज असोसिएशनच्या (मेस्टा) वतीने वारंवार शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही दखल घेण्यात येत नसल्याने, मेस्टाने १२ आॅक्टोबर हा दिवस शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळेच्या शिक्षकांनी गुरुवारी शाळांमध्ये काळ्या फिती बांधून विद्यार्थ्यांना शिकविले. काही शाळांमध्ये काळे ध्वज शाळेच्या गेटवर लावण्यात आले होते. या आंदोलनातून शाळांनी शासन व शिक्षण विभागाचा मूक निषेध नोंदविला. आरटीईचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत असतानाही, आरटीईचे प्रवेश नाकारल्यावर शिक्षण विभागाचे अधिकारी कारवाईची भाषा बोलतात. सरकारचे मंत्री, सचिव आमच्या मागण्या कानावरही घेत नाही. शासनाकडून एक रुपयांचे अनुदान नाही. अशा परिस्थितीत शाळा चालविणार कशा? काळा दिवस पाळूनही आमच्या मागण्या शासन गंभीरतेने घेत नसेल, तर येणाºया हिवाळी अधिवेशनात विधानसभेवर मोर्चे काढण्यात येतील. हे आंदोलन भविष्यात उग्ररूप धारण क रेल, असा इशारा संघटनेचे सचिव कपिल उमाळे, कोषाध्यक्ष नरेश भोयर यांनी दिला.