शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

न्यायालयात गेल्याशिवाय शाळांना पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

नागपूर : राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोरोनामुळे वर्षभरापासून बंद आहेत. पालकांकडून फी न भरण्यात आल्याने शाळा आर्थिक अडचणीत ...

नागपूर : राज्यातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोरोनामुळे वर्षभरापासून बंद आहेत. पालकांकडून फी न भरण्यात आल्याने शाळा आर्थिक अडचणीत आल्या आहेत. २०१७-१८ पासून आरटीईची प्रतिपूर्ती शाळांना मिळाली नाही. शालेय शिक्षण विभागाकडून उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विदर्भातील शाळांनी एकत्र येऊन न्यायालयात दाद मागावी, असा सूर आरटीई फाउंडेशनच्या संमेलनात सहभागी झालेल्या संस्थाचालकांनी आळवला.

फाऊंडेशनतर्फे हुडकेश्वर रोडवरील सभागृहात संमेलनाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी डॉ. एस.सी. गुल्हाने, प्रमुख अतिथी अ‍ॅड. बारंगे, राजाभाऊ टांकसाळे, अवंतिका लेकुरवाळे, खेमराज कोंडे, नरेश भोयर उपस्थित होते. यावेळी आरटीई फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे म्हणाले की, केंद्र सरकारकडून राज्याला ४४०१ कोटी रुपये मिळाले; पण राज्य सरकार ४८४ कोटी रुपयेच मिळाल्याचे सांगते. आरटीईचे ३९१६ कोटी रुपये कुठे गहाळ झाले, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

जोपर्यंत ४ वर्षांतील आरटीईची प्रतिपूर्ती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रवेश देणार नाही, असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. संमेलनासाठी उपाध्यक्ष राम वंजारी, सचिव अर्चना धबाले यांचे सहकार्य लाभले. यावेळी मधुकर दवलेकर, गजानन उमरेडकर, राजेंद्र अतकर, रमेश डोकरीमारे, प्रदीप सुतोने, संजय बोम्बटकर, दीपिका ठाकूर, मुकेश अग्रवाल, राजेश नंदापुरे, रिता पाटील, विजय अगडे, आशिष वरघने, संदीप सुखदेवे, नवलचंद वासनिक, दिलीप हिंगणेकर, अर्चना देवतळे, सुभाष धरमठोक आदी उपस्थित होते.